जागतिक समुदायाचे शिक्कामोर्तबच!

    27-Oct-2018
Total Views | 22


 

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कितीही घसा कोरडा करून आरडाओरडा केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले, तरी येणार्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला त्याचा काहीही लाभ होणार नाही, हे निश्चित! मोदी देशाला विकासपथावर पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, आपल्या सरकारचा कारभार नियोजनबद्ध रीतीने पुढे सांभाळत आहेत आणि त्याच वेळी राहुल गांधी आणि त्यांचा कॉंग्रेस पक्ष फक्त सरकारवर टीका करीत आहे, हे जनतेच्याही लक्षात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताचसेऊल शांती पुरस्कार- 2018’ घोषित झाला आहे. राहुल गांधी त्यांना चोर म्हणत असताना, सेऊल पीस फाऊंडेशन या संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन शांती पुरस्कारासाठी निवड केली आहे, ही बाब लक्षात घेतली, तर कॉंग्रेसची धडपड केवळ सत्तेसाठीच चालली आहे.
 

आता सीबीआयमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत, त्याला कॉंग्रेसकडून राजकीय स्वरूप देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. सीबीआयमध्ये जे काही घडते आहे, ते सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले असून, या प्रकरणात कायदा आपल्या शैलीने काम करीत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने यात आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा जनतेपुढे काही ठोस कार्यक्रम ठेवला, तर कदाचित कॉंग्रेसला थोडाफार फायदा होऊ शकेल. पण, कॉंग्रेस नुसती टीका करण्यातच धन्यता मानत आहे आणि मोदी देशाला पदोपदी प्रगतिपथावर नेण्यात यशस्वी ठरत आहेत. आपल्या देशातील जनतेची सर्वांगीण प्रगती कशी साधता येईल, याचाच सातत्याने विचार करणारे मोदी श्रेष्ठ, की मोदींवर कपोलकल्पित आरोप करणारे राहुल गांधी चांगले, याचा फैसला जनतेकडून केला जाईलच. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जनकल्याणाच्या ज्या योजना राबविल्यात, त्या लक्षात घेत सेऊल पीस फाऊंडेशनने मोदींची शांती पुरस्कारासाठी निवड केली, ही बाब लक्षात घेतली, तर मोदींची गाडी योग्य दिशेने प्रवास करते आहे, हे स्पष्ट होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल आणि आणि त्यांचा कॉंग्रेस पक्ष जातीयवादाचा आरोप करीत असला, तरी सेऊल पीस फाऊंडेशनला ही बाब अजीबात मान्य नाही. मोदींनी भारतातील जनतेमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेत, जाती-जातीत बंधूभाव कसा वाढीस लागेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेत, याची दखल सेऊल पीस फाऊंडेशनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली, यातच सगळे आले. संपूर्ण जगाच्या आर्थिक प्रगतीची कामना, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारतीय जनतेच्या मानवीय विकासाला गती देण्यासाठी केलेले प्रयत्न, या बाबी प्रामुख्याने लक्षात घेत संस्थेने मोदींची पुरस्कारासाठी निवड केली आहे, याकडे भारतातील विरोधी पक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. सामाजिक ऐक्य घडवून आणत भारतातील लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मोदींनी केलेल्या कामाची दखल कॉंग्रेस पक्ष कधीच घेणार नाही. तशी अपेक्षा करणेही चूकच. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर ती दखल घेतली गेली आहे.

 

भारतातील सामाजिक विषमता कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जे प्रयत्न केलेत, त्यात ते बर्यापैकी यशस्वी ठरलेत, असे अधिकृत निवेदनच सेऊल पीस फाऊंडेशनने केले असल्याने कॉंग्रेसने कितीही टीका केली, तरी त्याला काही महत्त्व उरलेले नाही. जनकल्याणाच्या जेवढ्या योजना मादींनी पंतप्रधान झाल्यानंतर सुरू केल्यात, त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला लागले आहेत. जगातल्या अनेक देशांनी ही बाब मान्य केली आहे. सेऊल पीस फाऊंडेशननेही ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने ही बाब मान्य नाही केली तरी फार फरक पडण्याचे कारण नाही. कॉंग्रेसला मोदींचे कोणतेच चांगले काम दिसत नाही. सत्तेत येण्याची घाई झालेली कॉंग्रेस, देशाच्या पंतप्रधानांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करते आहे, ही बाब लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.

या देशातल्या मतदारांनी मोदींना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिले आहे. सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. आणखी एक वर्ष राहिले आहे. कॉंग्रेसने वर्षभर तरी संयम ठेवायला हवा ना? सातत्याने भाजपावर हुकूमशाहीचा आरोप करणार्या कॉंग्रेसने लोकशाही मूल्ये पायदळी तुडविण्याचे पाप करू नये. सत्तेत येण्यासाठी सरकारवर आरोप करावेच लागतात हे मान्य केले, तरी देशाची बदनामी होईल, पंतप्रधानपदाची गरिमा संपुष्टात येईल, एवढ्या खालच्या पातळीवर कॉंग्रेसने उतरू नये. पण, ज्या राहुल गांधींनी स्वपक्षाच्याच पंतप्रधानांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेला अध्यादेश जाहीरपणे फाडून टाकत त्यांचा अवमान केला होता, ते राहुल गांधी विरोधी पक्षाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांचा सन्मान राखतील, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचेच!
 
सेऊल शांती पुरस्कार हा दर दोन वर्षांनी दिला जातो. जी व्यक्ती मानवतेच्या कल्याणासाठी झटते आणि जागतिक शांततेसाठी प्रयत्नरत असते, त्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. ही संस्था तर भारतातील नाही आणि त्या संस्थेवर मोदींचा वा भाजपाच्या नेतृत्वातील सरकारचा कुठलाही प्रभाव नाही. असे असतानाही जर ती संस्था मोदींना पुरस्कृत करीत असेल, तर त्याबाबत शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही. पण, मोदींचा कावीळ झालेली कॉंग्रेस हे कधीच मान्य करणार नाही. मोदींना सतत पाण्यात पाहणारी कॉंग्रेस मोदींचे अभिनंदन करण्याचे औदार्य दाखविणे तर दूरच! या पुरस्कारासाठी या वर्षी तेराशे दावेदार होते. पण, संस्थेने मोदींचीच निवड केली. सेऊल पीस फाऊंडेशनने घोषित केलेला पुरस्कार म्हणजे जागतिक समुदायाने मोदींच्या कार्यक्षमतेवर केलेले शिक्कामोर्तबच आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच सर्वप्रथम जनधन योजना राबविली. ज्या लोकांनी कधी बँक पाहिलीच नव्हती, अशा लोकांची खाती बँकेत उघडली गेल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा अनुकूल परिणाम झाला आहे. सरकारी योजनांचा लाभ आता थेट जनतेला मिळायला लागलेला आहे. योजनांममधला पैसा गरिबांपर्यंत न पोहोचण्याचे कारण म्हणजे भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनधन योजना प्रभावी सिद्ध ठरली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन पंतप्रधानांनी गरिबांच्या झोपडीतील धूर आणि काळोख दूर केला आहे. स्वच्छ भारत अभियान राबवून मोदींनी फार मोठे काम केले आहे. अस्वच्छतेमुळे आजार, रोगराई पसरायची आणि सार्वजनिक जीवनही त्यामुळे गढूळ व्हायचे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगत त्यांच्याच माध्यमातून स्वच्छता घडवून आणण्याची दमदार कामगिरी मोदींनी केली आहे. नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. ते जगात जिथे जिथे गेलेत, तिथे तिथे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली आहे. सदैव सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करताना त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे केंद्रित केले. त्यामुळेच भारतात काय सुरू आहे, याची माहिती जागतिक समुदायाला झाली...

अग्रलेख
जरुर वाचा
विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

शेतमजुराचा मुलगा ते आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक!

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अ‍ॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121