( traffic on Ghodbunder Road ) माजिवडा मेट्रो स्थानकावर छत उभारणीच्या कामामुळे माजिवडा उड्डाणपुलावरून मुंबईहून नाशिक, घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक १५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. त्यामुळे घोडबंदर रोडवर रविवार, दि. 20 एप्रिल रोजीपर्यंत वाहतुककोंडीचा सामना करावा लागणार आहे. येथील वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे.
Read More
ठाणे : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ ( Daud brother ) इक्बाल कासकर याच्या हस्तकाने खंडणीच्या माध्यमातून बळकावलेला घोडबंदर रोडवरील फ्लॅट ईडीने जप्त केला आहे. मुमताज शेख असे या हस्तकाचे नाव असून त्याने बांधकाम व्यावसायिकाला धमकावून कावेसरमधील निओपोलिस इमारतीतील घराचा ताबा घेतल्याचे समोर आले होते. २०२२ मध्ये मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीने हा फ्लॅट सील केला होता. त्यानंतर आज दुसर्यांदा या फ्लॅटवर कारवाई करण्यात आली.
७०हून अधिक गडकिल्ले तसेच जगातील उंच शिखरांपैकी एक किलीमांजारो सर करणारी नऊ वर्षीय ग्रिहिथा विचारे हिच्या जिद्दीची चित्तरकथा...
ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावर रिक्षा नाल्यात कोसळुन जिवीतहानी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एक कार नाल्यात कोसळल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. रुस्तमजी अग्निशमन केंद्राजवळील अर्बानिया सोसायटी समोर भरधाव ट्रकची धडक बसुन कार थेट नाल्यात कोसळली. सुदैवाने दुपारची वेळ असल्याने कार चालक सतिश सदानंद विचारे (४५) यांचा जीव वाचवण्यात अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले.
ठाणे महापालिका क्षेत्रात विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर रोड, ओवळा सिग्नल या ठिकाणी मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे २९ मे पर्यत रात्री ११:०० वा ते पहाटे ४:०० वाजेपर्यतच्या कालावधीत ठाणेकडून घोडबंदर रोड जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भाजपाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे. वाढीव पाण्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेची शिष्टमंडळे महापालिकेत धडकली असली, तरी महापौर नरेश म्हस्के यांच्या इशाऱ्यानंतरही घोडबंदर रोड परिसराला वाढीव पाणीपुरवठा मात्र अद्याप सुरू झालेला नाही. सध्या पाणीटंचाईचा प्रश्न कायम असून, श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडचे पाणी अडकल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू झाली आहे. व या प्रकारावरून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना केवळ समाजसेवेची आवड असल्याने लोकप्रतिनिधी बनलेल्या ठाण्यातील भाजप नगरसेविका अर्चना किरण मणेरा यांनी ‘कोविड’ काळात गोरगरिबांसह उच्चभ्रू नागरिकांसाठी फार मोठे कार्य केले. त्यांच्या या मदतीचा अनेक गरजूंना लाभ झाला. त्यामुळे सर्वांसाठीच त्या आशेचा ‘किरण’ ठरल्या. पती डॉ. किरण मणेरा यांच्या साथीने अर्चना यांनी कोरोना कालावधीत केलेल्या कार्याची घेतलेली ही दखल...
`कोरोना' रुग्णाचा कचरा उचलण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने खाजगी `दुकानदारी' सुरू झाली आहे. काही सोसायट्यांमध्ये रुग्ण तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांकडूनच कचरा उचलण्यासाठी खाजगी व्यक्तींचे क्रमांक दिले जात असल्याचा प्रकार घडला आहे. या व्यक्तींकडून कचरा उचलण्यासाठी पैसे आकारले जाणार असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले जाते, असा आरोप नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केला. खाजगी चाचणी, खाजगी रुग्णालय आणि आता कचरा उचलण्यासाठीही खाजगी व्यक्तींना पैसे मोजायचे, तर राज्य सरकार किंवा महापालिकेने केवळ निध
नियोजित कोपरी पूलाचे काम वेगाने होण्यासाठी पुलाचे काम सेनादलाकडे सोपवावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.