येत्या 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची 141वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या कवितांचा आशय समजून घ्यावा आणि त्यांच्या संस्कृतप्रचुर साहित्याची ओळख अभ्यासू लोकांना करून द्यावी, असे मनयोजित होते. त्यामुळे मुद्दामच हे ‘हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ ही कविता निवडली आहे.
Read More
भारत जोडो यात्रादरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनाकडून निदर्शने, आंदोलन केले. राज्यभरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती.
रामलल्ला अगदी खरं सांगतो, त्या भाजपचे हिंदुत्व खरे नाही आणि भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. काय म्हणता, आमचे हिंदुत्व खरे आहे का, आमचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध आहे का? थांबा, मी काय सांगणार? मॅडम आणि काकांना विचारतो. प्लिज, वेट, विचारून सांगतो...
हिंदूद्रोही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संग करणार्या शिवसेनेच्या खोटारड्या नि बाटग्या सावरकरप्रेमाच्या कपाळी मतदानरूपी गोटा हाणण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनीच करायला हवी. जेणेकरून शिवसेनेसारख्या अप्रामाणिक, संधीसाधू पक्षाला पश्चात्तापासाठी पुष्कळ वेळ मिळेल नि हिंदू दहशतवादाचा पुरस्कार करणार्यांशी संबंध जोडण्याच्या पापातून तो मुक्त होईल, शुद्ध होईल!
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ पुण्यातील स्वातंत्रवीर सावरकर अध्यासन केंद्र येथेही शेकडो नागरिक जमले.
वेगळ्या पद्धतीने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध
सर्वसाधारणपणे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी व स्वातंत्र्यवीर सावरकरांना परस्परांचे विरोधक म्हणूनच ओळखले जाते, किंवा जनतेच्या मनात तशीच प्रतिमा निर्माण केल्याचे-झाल्याचेही पाहायला मिळते. परंतु, गांधी व सावरकर हे दोन्हीही महापुरुष एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्या धर्मविषयक विचारांत साम्यही आढळते. दोघांनाही हिंदू धर्माचा पराकोटीचा अभिमान वाटे आणि दोघेही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, अस्पृश्यता आदींच्या विरोधातच होते.
राजकारणात येऊ इच्छिणार्या तरुणाईसमोर एक ‘जेटली मार्ग’ आहे आणि दुसरा ‘चिदंबरम मार्ग’ आहे. जेटली मार्ग व्यवस्था, कायदा, संविधान यांचा आदर बाळगणारा आहे. ‘चिदंबरम मार्ग’ सत्तेचा गैरवापर करणारा, देशाच्या व्यवस्थेशी खेळणारा, कायदा वाकविणार आणि अखेर चौकशीला सामोरे जावे लागणारा आहे. जनहिताचे, भ्रष्टाचारमुक्त राजकारण करणे ही अरुण जेटली यांना योग्य श्रद्धांजली ठरेल.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले असे व्यक्ती आहेत. ज्यांना हिंदूत्व समजले. मात्र, त्यांचे नाव घेण्याची लायकी नसलेले लोकही त्यांच्यावर टीका करत आहेत, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी बुधवारी व्यक्त केले. कारगील विजय दिवसाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते.