'स्वामी चिन्मयानंद' आध्यात्मिक क्षेत्रातील क्रांतिकारक

सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन

    11-May-2024
Total Views | 42

Dattatray Hosbale

मुंबई (प्रतिनिधी) :
"स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) हे आध्यात्मिक क्षेत्रातील क्रांतिकारक होते. स्वामीजींनी ज्ञानाची देवाणघेवाण करून आणि आत्मविश्वास निर्माण करून लोकांना सक्षम केले. जागतिक हिंदू संघटना स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा दिला. हिंदू संघटना आणि रामजन्मभूमावरचे भव्य राममंदिर ही स्वामीजींची दोन महान स्वप्ने आज साकार झाली आहेत.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले.


Dattatray Hosbale

स्वामी चिन्मयानंदांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त कोची येथे चिन्मय मिशन आयोजित चिन्मय-शंकरम २०२४ या कार्यक्रमात सरकार्यवाहंनी ‘स्वामी चिन्मयानंद: एक आध्यात्मिक क्रांतिकारी’ या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी स्वरूपानंद यांनी सरकार्यवाहंचे स्वागत केले.

हे वाचलंत का? : छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा! उबाठा आणि महायुतीचे कार्यकर्ते आमनेसामने

स्वामी चिन्मयानंदांविषयी बोलताना सरकार्यवाह म्हणाले, "समाज जेव्हा उपभोगतावाद आणि सांस्कृतिक शून्यतेत गुरफटला होता, तेव्हा जात, समुदाय आणि वर्गाच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन समाजाला योग्य मार्ग दाखवणारे आध्यात्मिक नेते उदयास आले. स्वामीजींच्या जीवनात आणि विचारांमध्ये समुद्राची खोली आणि हिमालयाची उंची होती. ते एक उत्कृष्ट आध्यात्मिक गुरु होते. शंकराचार्य, नारायण गुरु, चटम्पी स्वामीकाल, महात्मा अय्यंकली, माता अमृतानदामयी इत्यादींपासून सुरुवात करून, केरळ ही असंख्य आध्यात्मिक गुरुंची भूमी आहे. स्वामी चिन्मयानंद हे त्यांच्यातील चमकता तारा होते."


Dattatray Hosbale

'धर्म पाळायचा असतो', स्वामी चिन्मयानंदांनी आपल्या शिकवणीत यावर भर दिल्याचे सांगत सरकार्यवाह पुढे म्हणाले, "गीता ज्ञान यज्ञ हे स्वामीजींचे सर्वात मोठे योगदान होते. त्यांनी उपनिषदे, भगवद्गीता आणि इतर धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवले. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगात कुरुक्षेत्र रणांगणात गीतेची शिकवण दिली. कलियुगात स्वामीजींनी तेच केले. त्यांनी गीतेवर इंग्रजीत प्रवचने दिली. अनेकांनी त्याच्यावर टीका केली, पण शक्य असेल त्या मार्गाने धर्माचा प्रसार करण्यावर त्याचा भर होता. भारताच्या ज्ञानाचा संपूर्ण जगापर्यंत प्रसार करणे हे त्यांचे प्राधान्य होते."

पुढे ते म्हणाले, "स्वामी चिन्मयानंद आणि स्वामी विवेकानंद यांच्यात बरेच साम्य आहे. तरुण वयातही त्यांनी सामाजिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक मनुष्य दैवी आहे आणि त्यांची सेवा करणे हे देवाची सेवा करण्यासारखे आहे. या विचाराचा प्रसार त्यांनी केला."

अग्रलेख
जरुर वाचा
बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात दमण गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये नियोजित २१ नदी पुलांपैकी हा सोळावा नदी पूल आहे. वलसाड जिल्ह्यात असलेले सर्व पाचनदी पूल आता पूर्ण झाले आहेत. संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण २५ नदी पूल बांधले जात आहेत. वलसाड जिल्ह्यातील एमएएचएसआरमार्ग दादरा आणि नगर हवेलीमधील 4.3 किमीसह सुमारे ५६ किमी लांबीचा आहे. हा मार्ग जारोली गावातून सुरू होतो आणि वाघलदरा गावात संपतो. या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, ३५० मीटर लांबीचा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121