ग्रेसांच्या कविता नेमक्या 'त्या'च वेळी कळतात! - गुरु ठाकूर

    10-May-2023
Total Views | 108

gress 
 
मुंबई : आज दि. १० मे ग्रेसांचा जन्मदिवस. ग्रेसांची कविता नेहमी समजत नाही असे म्हणताना सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी मुंबई तरुण भारताला दिलेल्या मुलाखतीत ग्रेसांच्या कवितेबाबत त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले आहेत.
 
कविता कशी असावी व उत्तम कवी कोण असा प्रश्न विचारला असता गुरु म्हणाले, "जी कविता सोप्या शब्दात असते व सगळ्यांना समजते ती कविता चांगली. कविता लोकांना आपल्या वाटल्या पाहिजेत. त्यांच्या भावनांशी त्या जुळायला हव्यात. सोप्या शब्दात तयार झालेली कविता उत्कृष्ट. केवळ जाड शब्द कवितेत येता कामा नयेत. मात्र ग्रेसांची कविता वेगळी आहे. ती सहज समजत नाही. पण आपण जेव्हा वेगळ्या मानसिकतेत असतो तेव्हा त्या संदर्भात लिहीलेली त्यांची कविता वाचली की लगेच आपल्याला आपलीशी वाटते. त्यामुळे ग्रेसांनी लिहिलेली कविता त्या विशिष्ट मनस्थितीत असल्यावरच समजते."
 
कवी ग्रेस म्हणजेच माणिक सीताराम गोडघाटे यांचा जन्म १० मे १९३७ साली झाला. त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धातच काव्य लेखनास सुरुवात केली. दुःखाचे सोहळे करणारे वेदनेचे महाकवी अशी त्यांना त्यांच्या गहन काव्याने ओळख करून दिली. ग्रेसांची काव्ये गूढ असतात व त्यांच्या ललित कथा आणि कविता ओढ लावतात.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121