राहुल गांधींची मुक्ताफळे! म्हणे अग्निवीरमुळे समाजात गुन्हेगारी वाढणार

    15-Nov-2022
Total Views | 56
RAHUL


हिंगोली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही हिंगोलीत पोहोचली होती. येथील माळहिवरात कॉर्नर सभेत भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की,"अग्निवीर योजनेमुळे समाजात गुन्हेगारी वाढेल." केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी अग्निवीर आणि अग्निपथ या दोन योजना आणल्या. या दोन्ही योजनेविरुद्ध अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलन झाली. परंतु हिंगोलीच्या सभेत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.



केंद्र सरकारने सैन्यात भरती इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. चार वर्षाच्या सेवेनंतर हे अग्निवीर हे आपल्या गावी येतील. अशावेळी या बेरोजगार झालेल्या अग्निवीर तरुणांकडे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण असेल, मग त्यांच्याकडून गुन्हेगारी घडू शकते. त्यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते, असे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी केले. देशाच्या सैन्यात जाणारा तरुण हा देशाच्या सेवेसाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान द्याला तयार असतो. अशावेळी राहुल गांधी यांनी केलेले हे विधान म्हणजे भारतीय सैन्यावर आणि भारतीय सैन्याच्या प्रशिक्षणावर शंका घेतल्यासारखे आहे, अशी टीका आता राहुल गांधींवर केली जात आहे.







अग्रलेख
जरुर वाचा
पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही वेगाने करण्‍यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्‍याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्‍यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्‍या स्‍वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे. पवई तलावाच्‍या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121