राहुल गांधींची मुक्ताफळे! म्हणे अग्निवीरमुळे समाजात गुन्हेगारी वाढणार

    15-Nov-2022
Total Views | 56
RAHUL


हिंगोली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही हिंगोलीत पोहोचली होती. येथील माळहिवरात कॉर्नर सभेत भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की,"अग्निवीर योजनेमुळे समाजात गुन्हेगारी वाढेल." केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी अग्निवीर आणि अग्निपथ या दोन योजना आणल्या. या दोन्ही योजनेविरुद्ध अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलन झाली. परंतु हिंगोलीच्या सभेत राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.



केंद्र सरकारने सैन्यात भरती इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. चार वर्षाच्या सेवेनंतर हे अग्निवीर हे आपल्या गावी येतील. अशावेळी या बेरोजगार झालेल्या अग्निवीर तरुणांकडे शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण असेल, मग त्यांच्याकडून गुन्हेगारी घडू शकते. त्यामुळे समाजात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते, असे वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी केले. देशाच्या सैन्यात जाणारा तरुण हा देशाच्या सेवेसाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान द्याला तयार असतो. अशावेळी राहुल गांधी यांनी केलेले हे विधान म्हणजे भारतीय सैन्यावर आणि भारतीय सैन्याच्या प्रशिक्षणावर शंका घेतल्यासारखे आहे, अशी टीका आता राहुल गांधींवर केली जात आहे.







अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121