कंगनाला व्हावे लागणार १४ दिवस होम क्वारंटाईन

    07-Sep-2020
Total Views | 123

Kangana_1  H x
 
मुंबई : मुंबईबद्दल वक्तव्य केल्यानंतर शिवसेना विरुद्ध कंगना रानौत असा सामाना रंगला आहे. यावेळी मुंबई महापालिकेने अचानकपणे तिच्या पाली हिलमधील कार्यालयाची पाहणी केल्यानंतर आता तिला मुंबईत येताच होम क्वारंटाईन करणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकाच्या नियमांनुसार तिला १४ दिवस होम क्वारंटाईन होण्याची आठवण महापौरांनी करून दिल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
“अभिनेत्री कंगना रानौत ९ सप्टेंबरला मुंबईत दाखल होणार आहे. ती मुंबईत राहत असल्यामुळे ती विमानमार्गे मुंबईत आली तर तिला नियमानुसार होम क्वारंटाईन व्हावेच लागेल. हा केंद्र आणि राज्य सरकारने बनवून दिलेला नियम आहे. आम्ही फक्त त्याची अंमलबजावणी करत आहोत. समजा, ती सात दिवसांपेक्षा कमी दिवस मुंबईत राहणार असेल तर होम क्वारंटाईन नियम तिला लागू होणार नाही.” अशी माहिती अधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणी कंगना यांच्यातील हा वाद आणखीनच वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121