अभिनेत्री दिव्या चौक्सीचे कर्करोगामुळे निधन

    13-Jul-2020
Total Views | 121
Divya_1  H x W:


कर्करोगाशी लढता लढता मागितली होती मदत!


मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाशी लढा देणारी अभिनेत्री आणि मॉडेल दिव्या चौक्सीचे सोमवारी निधन झाले. तिची ही झुंज अपयशी ठरली आहे. यासंदर्भात दिव्याची मावस बहिण सौम्याने फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली. दिव्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये निधनापूर्वीच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ती मृत्यूच्या जवळ आहे. दिव्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोस्ट पाहून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.


मृत्युपूर्वी दिव्याने इन्स्टाग्रामवर लिहिले होते की, 'शब्द ती गोष्ट सांगू शकत नाहीत जे मला सांगायचं आहे. माझ्याकडे बरेच दिवसांपासून सहानुभूति देणारे मेसेज येत आहेत. परंतु, वेळ अशी आहे की, मी तुम्हा लोकांना सांगू इच्छिते की, मी सध्या मृत्यूशय्येवर आहे. परंतु, मी खंबीर आहे. कदाचित अजिबात दुःख नसलेलं आणखी एक आयुष्य असतं. सध्या कोणताच प्रश्न नाही. फक्त देवच जाणतो की, तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात.'


दरम्यान, दिव्या सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव्ह नव्हती. परंतु, तिने तिच्या शेवटच्या ट्वीटमध्ये मदत मागितली होती. दिव्याने आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'कोणाला misseltow थेरपीबाबत माहिती आहे का? मला मदतीची गरज आहे.' चित्रपट 'है अपना दिल तो आवारा' मधून दिव्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. दिव्या अनेक टीव्ही शो आणि जाहीरातींमध्येही दिसून आली होती.


अग्रलेख
जरुर वाचा
अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय ..

मुंबईतील विकासकामे थांबवता येणार नाहीत परंतु वारसस्थळांची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचं : उच्च न्यायालय

मुंबईतील विकासकामे थांबवता येणार नाहीत परंतु वारसस्थळांची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचं : उच्च न्यायालय

मेट्रो-३ प्रकल्पाच्या भूमिगत कामांमुळे इमारतीला नुकसान झाल्याचा आरोप करणाऱ्या जे. एन. पेटिट हेरिटेज इमारतीच्या विश्वस्तांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत गुरूवार, दि.११ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्या.जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने विकास आणि वारसा यामधील समतोल राखत म्हटले की, मुंबईसारख्या शहरात विकास थांबवता येणार नाही. परंतु भावी पिढीसाठी वारसा इमारतींचे जतन आणि देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121