लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केले लिफ्टचे उदघाटन

    26-Jun-2018
Total Views | 25



 

नाशिक : मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक अशी ओळख असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. २, ३ व ५, ६ वर रेल्वे प्रशासनातर्फे दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी लिफ्ट बसविण्यात आल्या. गेल्या काही वर्षांपासून अधिकारीवर्गात स्वतःला मिरवून घेण्याची सवय लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचाच प्रत्यय मनमाड येथे बघायला मिळाला. सामान्यतः रेल्वेच्या प्रथेनुसार स्थानिक लोकप्रतिनिधी (खासदार) यांना व रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक किंवा जनरल मॅनेजर यांना निमंत्रित करून उद्घाटन केले जाते, पण स्वतःला मिरवून घेण्याची घाई झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच हस्ते उद्घाटन केले. मनमाड रेल्वे स्टेशनचे मुख्य स्टेशन अधीक्षक सुनील गलांडे यांनी स्वहस्तेच उद्घाटन उरकून घेतले. कालच्या या उद्घाटन समारंभाबद्दल खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून ते संबंधित प्रकरणाची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत. रेल्वे प्रशासनातर्फे फक्त प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट सुरू करा, अशी तोंडी सूचना देण्यात आली होती पण या अधिकारीवर्गाने तिचे उद्घाटन थाटात करून टाकले. या पुर्वीदेखील २०१३-१४ साली अधिकारी वर्गाने आचार संहितेचे कारण देत पादचारी पुलाचे उद्घाटन स्थानिक खासदार हरिशचंद्र चव्हाण ह्यांना विश्वासात न घेता केले होते.

अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121