एका वर्षात ३९.३ दशलक्ष लोकांनी केली उपासमारीतून सुटका!

    01-Aug-2024
Total Views | 44
hunger index bharat down


मुंबई :        देशातील उपासमारीचे प्रमाण तब्बल १३.७ टक्क्यांनी घसरले आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न सुरक्षा आणि पोषण(एसओओफआय)च्या अहवालातून समोर आले आहे. या अहवालावर नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी भाष्य केले असून उपासमारीचे प्रमाण कमी करून २०३० पर्यंत भूक निर्देशांक शून्य पातळीवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चितच साध्य केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


हे वाचलंत का? -     युरोपियन कारखान्यांतील उत्पादकता निराशाजनक; वाढत्या मागणीला थंड प्रतिसाद


चंद पुढे म्हणाले, याचे श्रेय भारताने युएन एजन्सींना उपलब्ध करून दिलेल्या सुधारित डेटाला दिले जाऊ शकते. देशातील उपासमारीचे प्रमाण २०२२ मध्ये १६.६ टक्के इतके होते तर २०२३ मध्ये हेच प्रमाण १३.७ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून आले आहे. देशातील भुकेचे प्रमाण २०२०-२२ मध्ये २३३.९ दशलक्ष वरून २०२१-२३ पर्यंत १९४.६ दशलक्ष इतके कमी झाले आहे. याचाच अर्थ असा आहे की, एका वर्षात भारतात ३९.३ दशलक्ष लोक उपासमारीतून बाहेर आले आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

केंद्र सरकारने एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत काही महिन्यांच्या व्यत्ययासह ८०० दशलक्ष मासिकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत अतिरिक्त ५ किलो तांदूळ पुरवले. त्याचबरोबर, सुमारे १०० दशलक्ष टन (एमटी) तांदूळ आणि गहू मोफत रेशन योजनेंतर्गत पुरवठा करण्यात येत आहे. आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नागरिकांना मासिक ५ किलो मोफत अन्नधान्य पुरवठा केला जात असून योजना २०२८ पर्यंत पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121