"सत्ता आल्यास आदित्य ठाकरेंची चौकशी करणार!", शिवसेना नेत्याचा इशारा

    15-Nov-2024
Total Views | 88
 
AT
 
मुंबई : (Aaditya Thackeray) शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा थेट उल्लेख करत आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे. आदित्य ठाकरेंनी गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी दापोलीतील सभेमध्ये सडकून टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा महायुतीचे सरकार आले तर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतील असा थेट इशारा दिला आहे.
 
काय म्हणाले रामदास कदम?
 
"दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव होते. आमची सत्ता आल्यावर त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही," असं रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना इशारा देताना म्हटलं आहे.
 
तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत, "आदित्य ठाकरे रात्री १२ वाजता घराबाहेर जाऊन सकाळी पाच वाजता येतो. याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्रासमोर यायला पाहिजेत," असं रामदास कदम यांनी म्हटले आहे.
 
"आपली औकात बघून आदित्यने बोलावं, शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या, तुरूंगात गेलो, पण त्यांचे पक्षासाठी काय योगदान आहे?", असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.
 
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
 
दापोलीतील सभेत आदित्य ठाकरेंनी थेट कोणाचाही उल्लेख न करता, इथेही एक गद्दार आहे. तो दादागिरी करतो, रडतो असं म्हणत अप्रत्यक्षपणे रामदास कदमांवर निशाणा साधला होता. याचेच जोरदार प्रत्युत्तर रामदास कदमांनी दिले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121