पुणे, दि. ५ : (Pradeep Rawat)“कोणासोबतही शांतता पूर्ण सह अस्तित्व हे इस्लामला शक्य नाही. हा केवळ वर्तमान नाही हा इस्लाम जन्माला आल्यापासूनचा इतिहास आहे,” असे परखड मत माझी खा. प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माझी खा. प्रदीप रावत, लेखक आणि व्याख्याते भरत आमदापुरे, श्रीकांत लिंगायत यांचे बंधू चंद्रकांत लिंगायत आदी उपस्थित होते. हुतात्मा श्रीकांत लिंगायत स्मृती समिती, कै.श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्ट, विवेक विचार मंच, राजे शिवराय प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
संविधान रक्षणासाठी हिंदूंना शत्रुबोध आवश्यक असल्याचे स्पष्ट मत रावत यांनी मांडले. ते म्हणाले की, “राजकीय हिंदूत्वात त्रुटी जरी असल्या तरी, त्या दूर करून देशाच्या हितासाठी ते आत्मसात करायला हवे. कारण हिंदू टिकला तरच संविधान टिकेल.” हिंदू बहुसंख्य आहेत तो पर्यंतच संविधान सुरक्षित आहे. संविधानाच्या रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ असायला हवे. कारण तेव्हाच सांस्कृतिक हिंदुत्वाला बहर येतो. शांततापूर्ण सहअस्तित्व इस्लामला शक्य नाही. हा केवळ आताचा नाही, तर त्याच्या जन्मापासूनचा इतिहास आहे. म्हणून छत्रपती शिवरायांनी एक हजार वर्षाच्या धर्मांध इस्लामी सत्तेचा पाया उखडून टाकण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. एक हजार वर्षांच्या अन्याय-अत्याचारात मरण पावलेल्या राष्ट्रीय पित्रांचा दिन आपण आणला पाहिजे. इस्लामला हिंदूंच्या नाही तर इस्लामच्या नजरेतून पाहायला हवे. इस्लाम रक्त बंधुत्व नाही, तर धर्मबंधुत्व मानतो. म्हणूनच ते धर्म म्हणून मतदान करतात. जातीपातीत विभागलेल्या हिंदूंनीही याचा विचार करायला हवा. संविधानाच्या रक्षणासाठी हिंदू म्हणून मतदान करायला हवे, असे आवाहन रावत यांनी केले. यावेळी भरत आमदापुरे म्हणाले की, “संविधान, लोकशाही मुल्यावर निष्ठा ठेवणे जिहाद्यांना मान्य नाही. कुराण आधी की संविधान असा प्रश्न धर्मांध इस्लामच्या अनुयायांना विचारायला हवे.” हिंदू समाज आज राजकीयदृष्ट्या जागृत झाला असला तरी प्रश्न सुटलेला नाही. केवळ राजकीय परिवर्तन पुरेसे नसून, समाजाचा मानस बदलायला हवा,”असे ते म्हणाले.
लिंगायत २०० टक्के हिंदूच
”शंकराचा पुजारी असलेले लिंगायत तेंव्हाही हिंदू होते आणि भविष्यातही राहतील. हिंदू समाज तोडून जातीपातीत वाद घालण्याचे काम काही लोक करत आहेत. लिंगायत समाज हा २०० टक्के हिंदू असून, हिंदू धर्म आणि संविधानाच्या रक्षणासाठी त्याने रक्त सांडले आहे.” असे परखड मत चंद्रकांत लिंगायत यांनी मांडले.चंद्रकांत लिंगायत पुढे म्हणाले, “संविधानिक मूल्यांची हत्या करणार्या आणीबाणीच्या विरोधात देशभरातील तरुणाईने संघर्ष केला. यामध्ये श्रीकांतने स्वतःला झोकून दिले. त्यामुळे त्याला १९ महिन्यांचा तुरूंगवासही झाला. त्यावेळी त्यांनी बी.कॉम पूर्ण केले. २६ जानेवारी १९८२ रोजी भवानी पेठेत पतित पावन संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीकांत आपल्या मित्रांसह गेला. यावेळी भारतमातेचा जयघोष आणि पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रम संपल्यावर परत जाताना काही जिहाद्यांनी श्रीकांत आणि त्याच्या मित्रांवर झुंडीने भ्याड हल्ला केला. त्याने तब्बल दीड महिना मृत्यूशी झुंज दिली, पण ती अपयशी ठरली,” या आठवणी चंद्रकांत लिंगायत यांनी सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले. आभार महेश पवळे यांनी मानले.