सणासुदीच्या काळात डिजिटल फसवणूक टाळा; 'एनपीसीआय'कडून सतर्कतेचा सल्ला!

    21-Oct-2024
Total Views | 40
digital payment precautions and guidelines


मुंबई : 
     देशात सणासुदीच्या वातावरणात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री सुरू असते. याच पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने डिजिटल पेमेंट फसवणुकीपासून वाचण्यासाठी महत्त्वाचे सल्ले जारी केले आहेत. ग्राहकांकडून सणासुदी काळात होणाऱ्या दुर्लक्षामुळे एनपीसीआयने आवाहन केले आहे.




दरम्यान, झकपक ऑफर आणि सूट सवलतींमुळे अनियंत्रित खरेदीला चालना मिळण्यास पोषक वातावरण, विक्रेते आणि अविश्वासार्ह व्यवसायांबद्दल पुरेशी माहिती नसणे, वैयक्तिक माहितीची देवाणघेवाणीमुळे डेटा चोरी होण्याचा धोका या सर्व बाबींचा विचार करता एनपीसीआयकडून प्रत्येक खात्यासाठी मजबूत आणि वेगळा विशिष्ट पासवर्ड तयार करून सुरक्षा वाढविण्याचा सल्ला ग्राहकांना देण्यात येत आहे.

विशेषतः खरेदीसाठी शॉपिंग मॉल्समधील ओपन वाय-फाय नेटवर्कसारख्या असुरक्षित नेटवर्कचा वापर टाळा. त्यामुळे आर्थिक माहिती हॅकर्सना मिळविता येते. आपण नक्की काय ऑर्डर केले आहे याची नोंद ठेवणे ग्राहकांकडून चुकू शकते. त्यातून फिशिंग स्कॅम्सचा धोका संभवतो. बनावट डिलिव्हरी नोटिफिकेशन्स टाळण्यासाठी पेमेंट लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोनदा तपासून पाहा अशा स्वरुपाची जागरुकता ग्राहकांमध्ये केली जात आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121