मुंबई : अरबी समुद्रातून जाणार्या ‘बिपरजॉय’ वादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधील पोरबंदरपासून ४८० किमी, द्वारकापासून ५३० किमी आणि कच्छमधील नालियापासून ६१० किमी अंतरावर आहे. ते दि. १५ जूनपर्यंत गुजरात आणि पाकिस्तानमधील कराचीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान खात्याकडून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर राज्यातल्या मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. तर गुजरातला या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचा अंदाज असून हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्टाच्या किनारपट्टी भागामध्ये मोठ्या लाटा उसळतील असा इशारा देण्यात आला होता.