पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले

    04-May-2023
Total Views |
ramdas-kadam-statement-on-sharad-pawar-resignation
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष पदावरून पायउतार झाले आहेत. पवारांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देऊन एका दगडात दोन पक्षी मारले आहेत, त्यांनी राजीनामानाट्यातून अजित पवारांना चपराक लगावत त्यांना उघडं पाडलं,” असे भाष्य रामदास कदम यांनी केले आहे.

“महाराष्ट्रातील आणि देशातील राष्ट्रवादीची जनता माझ्याबरोबर आहे. अजित पवार तुमच्याबरोबर नाहीये. हे त्यांनी अजित पवारांना दाखवून देत, एकाकी पाडलं आहे. मधल्या काळात अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होती. त्यासाठी काही आमदारांच्या भेटीगाठीही सुरू होत्या. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा देत अजित पवारांना दाखवून दिलं की, हा पक्ष माझा आहे, तुझा नाही. तुझ्याबरोबर कुणीही नाही,” असेही रामदास कदम म्हणाले.

राहुल गांधींचा सुप्रिया सुळेंना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून गोंधळ सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करुन चर्चा केली. सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा जाण्याची शक्यता असल्याने राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांना थेट फोन करत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत आपले मत मांडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा,” अशी विनंती राहुल गांधी यांनी या वेळी केली.


 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121