बँकेची एक चूक आणि ग्राहकांच्या खात्यात आले कोट्यावधी रुपये!

    17-Nov-2023
Total Views | 138
 banks
 
मुंबई : युको बँकेच्या एका चुकीमुळे तात्काळ पेमेंट सेवेच्या माध्यमातून काही बँक खात्यांमध्ये ८२० कोटी रुपये जमा झाले. बँकेला आपली चूक लक्षात येताच त्यांनी पैसे वसूलीची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत बँकेने ६४९ कोटी रुपये वसूल केले आहेत. ही रक्कम एकूण रक्कमेच्या ७९ टक्के आहे. अद्याप २१ टक्के रक्कम वसूल होणे बाकी आहे.
 
बँकेने अद्याप स्पष्ट केलेले नाही की एवढी मोठी रक्कम अचानक खात्यात कशी हस्तांतरित झाली, ती मानवी चुकांमुळे होती की तांत्रिक बिघाडामुळे की हॅकिंगमुळे? बँकेचे म्हणणे आहे की हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी रक्कम म्हणजे ६४९ कोटी रुपये परत आले आहेत.
 
मात्र, अद्यापही सुमारे २०० कोटी रुपये वसूल न झाल्याने ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेचा परिणाम युको बँकेच्या शेअरवर देखील झाला. गुरुवारी युको बँकेचा शेअर १.१ टक्क्यांनी घसरून ३९.३९ रुपयांवर आला. बँकेने या घटनेची माहिती तपास यंत्रणांना दिली आहे.
 
बँकेने म्हटले आहे की, १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत त्यांच्या तात्काळ पेमेंट सेवेमध्ये अंतर्गत अडथळा निर्माण झाला होता, त्यानंतर बँकेने ऑनलाइन पेमेंट सेवा बंद केली. बँकेने बीएसईला या घटनेची माहिती दिली आहे आणि सांगितले आहे की, सावधगिरीचा उपाय म्हणून, बँकेने चुकून पैसे ट्रान्सफर करण्यात आलेली खाती ब्लॉक केली आहेत. रिझर्व्ह बँकही आपल्या स्तरावर या त्रुटीच्या कारणाचा तपास करत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

*भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!*

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121