...आणि फडणवीसांनी खडसेंना सुनावले!

    18-Aug-2022
Total Views | 84
 
devendra
 
 
 
 
मुंबई : राज्यात आता फक्त मंत्रालयाच अस्तित्वात आहे, सचिवालय अस्तित्वात नाही असे उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला. "राज्यात बहुमत असताना कुठलेही निर्णय घेतले नाहीत आणि बहुमत गमावल्यावर आणि राज्यपालांकडून पत्र आल्यावर धडाधड निर्णय घेतले हा प्रकार का केला? तेव्हा तुम्हांला ते सुचले नाही" असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही अधिकार हे सचिवांकडे सुपूर्द केले होते त्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.
 
 
एकनाथ खडसे यांच्या आधी शिवसेनेचे विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांनीही याच मुद्दयावरून सरकारवर टीका केली होती. राज्यात सध्या पूरस्थिती आहे पण मदत यंत्रणा, आपत्कालीन सुविधा पुरवायला शासकीय यंत्रणाच जागेवर नाही असा आरोप सचिन अहिर यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनीही विधानपरिषदेत याच मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता पण देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर देत विरोधकांचा हा प्रयत्न हाणून पाडला.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121