मुंबईकरांसाठी पुढील दोन दिवस महत्वाचे, हवामान खात्याचा रेड अलर्ट

    06-Jul-2022
Total Views | 50
 
mumbai
 
 
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पावसाने आधीच जनजीवन विस्कळीत होत असताना आता पुढचे दोन दिवस अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. हवामान खात्याकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर झाला आहे. फक्त मुंबईच नव्हे तर ठाणे, नाशिक या जिल्ह्यांसाठीही रेड अलर्ट जाहीर झाला आहे. पाच हजार सीसीटीव्हींच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
 
 
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला भेट देऊन कुठल्याही परिस्थितीत मुंबईकरांची गैरसोय होणार नाही यासाठी काय काय केले पाहिजे याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पाणीभरून काही काळापुरती रेल्वे सेवा कोलमडून जाते. तेव्हा, बेस्ट प्रशासनाकडून जादा गाड्या सोडण्यात याव्यात तसेच त्यांना चहा, नाश्त्याचीही सोय पालिकेकडून करण्यात यावी, अशीही सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सर्वसामान्य जनता आणि पालिका प्रशासन या दोघांनींही एकत्र मिळून या संकटाचा सामना करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121