मुंबईकरांना धोक्याचा इशारा! बुधवारीही मुसळधार पावसाचा इशारा

    13-Jul-2022
Total Views | 53

tides
 
मुंबई : मुंबई तसेच किनापट्टीच्या सर्वच प्रदेशांना बुधावारीही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे आहेत कारण या काळात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने सर्वच नागरिकांना तसेच मच्छीमारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
 
 
बुधवारी पौर्णिमा असल्याने समुद्राला उधाण आहे, मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र अशी स्थिती या दिवशी मुंबईकरांसाठी असणार आहे. गेले काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस होत असल्याने वाहतूक कोंडी, मंदावलेली रेल्वेसेवा या सगळ्यांमुळे आधीच ट्रस्ट झालेल्या मुंबईकरांसाठी बुधवारचा दिवसही परीक्षा घेणारा ठरणार आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121