मी नतमस्तक होऊन ब्राम्हण समाजाची माफी मागतो : विनायक राऊत

    25-Mar-2022
Total Views | 1335
 
 
vinayak raut
 
 
मुंबई : औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ब्राह्मण समाजावर भाष्य केले होते.ज्यामध्ये ब्राह्मण समाज व हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या होत्या. विनायक राऊतांनी बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांचा दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा ब्राह्मण सेवा संघाने दिला होता. यानंतर विनायक राऊत यांनी ब्राम्हण समाजाची जाहीर माफी मागितली
 
 
'शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही' असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला होता. आज ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेताना आनंद झाला. काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गगार निघाले त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांना कृपा आशीर्वाद कायम ठेवा असे म्हटले आहे. काही चूक झाली असेल तर माफ करा असंही म्हटलं.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121