कृत्रिम जगापासून दूर जात आहेत लोक

    27-Feb-2022   
Total Views |
                         
social media
 
 
 
वैयक्तिक आयुष्यापासून ते कार्यक्षेत्रापर्यंत, जगाच्या प्रत्येक भागात राहणारे लोक या मायावी जगात उपस्थित राहिल्यामुळे उद्भवणारे धोके आणि संघर्ष समजून घेत आहेत. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून या आभासी जगापासून दूर जाणार्‍या वापरकर्त्यांना हे जाणवू लागले आहे की, कृत्रिम जग हे वास्तवाशी सांगड घालण्यात अडचणीचे ठरू शकते
 
 
आभासी जगाशी निगडित अनेक व्यावहारिक पैलू आणि धोके लोकांना येथे वेळ घालवण्यापासून रोखत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आभासी लोकप्रियतेमुळे निर्माण होणारा गोंधळ आणि वास्तवही लोकांना आता समजू लागले आहे. नुकताच फेसबुकच्या ‘मेटा’ कंपनीला ८ वर्षांत प्रथमच मोठा तोटा सहन करावा लागला आहे. ताज्या अहवालानुसार फेसबुकच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या वार्षिक चार टक्क्यांनी वाढली आहे. त्याचवेळी फेसबुकला दरवर्षी प्रचंड महसूलही मिळत आहे. त्यामुळे गेल्या तिमाहीपासून, कंपनीला दैनिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या वाढवणे अपेक्षित होते. मात्र, ही संख्या अपेक्षेप्रमाणे वाढली नाही. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्के कमी आहे.
 
 
खरेतर, व्हर्च्युअल जगात सर्वाधिक चर्चेचा व्यासपीठ असलेल्या फेसबुकच्या आगमनापासून वापरकर्त्यांच्या वाढत्या अंतरामागे अनेक कारणे आहेत. इतर प्लॅटफॉर्मद्वारे पुरवल्या जाणार्‍या सुविधांची वाढती यादी आणि वैयक्तिक माहिती शेअर न करण्याच्या तांत्रिक ‘सेटिंग’मुळे आर्थिक नफ्यात घट झाल्याचा आरोप कंपनी करत असली तरी त्यामागे सामाजिक, मानसिक आणि वैयक्तिक कारणांची संपूर्ण यादी आहे. गोपनीयतेच्या उल्लंघनापासून ते अनावश्यक असामाजिक व्यस्ततेपर्यंत, ‘व्हर्च्युअल’ क्रियाकलापांमुळे निर्माण होणारा ताण आणि वास्तविक जीवनाऐवजी स्क्रीनकडे टक लावून वेळ घालवणारा वाढता वेळदेखील वापरकर्त्यांना त्यापासून दूर नेत असल्याचे मुख्य कारण यामागे आहे. अमेरिकन ‘सायकोलॉजिकल ऑर्गनायझेशन’च्या मते, फेसबुकचा वापर जर लोकांनी सतत केला तर मानवी उत्पादकता ४० टक्क्यांनी कमी होते.
 
 
अशा परिस्थितीत, वैयक्तिक आयुष्यापासून ते कार्यक्षेत्रापर्यंत, जगाच्या प्रत्येक भागात राहणारे लोक या मायावी जगात उपस्थित राहिल्यामुळे उद्भवणारे धोके आणि संघर्ष समजून घेत आहेत. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून या आभासी जगापासून दूर जाणार्‍या वापरकर्त्यांना हे जाणवू लागले आहे की, कृत्रिम जग हे वास्तवाशी सांगड घालण्यात अडचणीचे ठरू शकते. यामुळे या प्लॅटफॉर्मवर आपली उपस्थिती नोंदविलेल्या वापरकर्त्यांद्वारे सामायिक केलेली सामग्री पूर्णपणे दुर्लक्षित होत असल्याचे चित्र आहे. इतकेच नाही, तर फेसबुकवर नकारात्मक आणि द्वेषपूर्ण मजकूर पसरवण्यासाठी वैयक्तिक माहिती शेअर करणे आणि मानवी तस्करीची समस्या निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आपल्या देशात ‘फेक न्यूज’ आणि नकारात्मक ‘कमेंट्स’साठीही फेसबुक हे माध्यम खूप चर्चेत आहे.
 
 
अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वापरकर्ते या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. अडचणीच्या क्षणीही, येथे दिसणारी वैचारिक द्वंद्व वास्तविक जगात सामाजिक-कौटुंबिक वातावरणात दिशाहीनता वाढवत आहे. परिणामी, वापरकर्ते या प्लॅटफॉर्मपासून अंतर ठेवत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. काही काळापूर्वी, जागतिक स्तरावरील ‘डिजिटल मार्केटिंग’ कंपनी ‘रिबूट’ ऑनलाईनच्या अभ्यासात असे समोर आले होते की, दर महिन्याला सुमारे पाच लाख लोक सोशल मीडियापासून दूर जात आहेत. यासोबतच फेसबुकसारखे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म हेदेखील केवळ वेळ काढण्याचे एक माध्यम आहे. दोन वर्षांत ‘कोविड’ युगात बदललेल्या जीवनशैलीमुळे स्क्रीनच्या दुनियेत लोकांच्या उपस्थितीचा वेळ खूप वाढला होता. शिक्षण असो किंवा इतर गोष्टी किंवा सामान्य दिनचर्याशी संबंधित ‘अपडेट्स’ शेअर करणे असो. वागण्या-बोलण्यात, आभासी जगाच्या दुनियेत बराच वेळ जात होता. पण आता सर्वसामान्यांना कळायला लागले आहे की, गरज असो किंवा सुट्टी असो, सतत ऑनलाईन राहण्याच्या सवयीमुळे अनेक आजारही होऊ लागले आहेत.
 
 
‘लाईफलॉक’च्या ‘नॉर्टन सायबर सेफ्टी - २०२ इनसाईट रिपोर्ट’मध्ये या बाबत विस्तृत टिप्पणीदेखील करण्यात आली आहे. ‘कोविड’ महामारीमुळे, जवळजवळ प्रत्येक तीनपैकी दोन, लोकांना ऑनलाईन राहण्याची सवय लागली आहे. युकेच्या ‘फीलगुड कॉन्टॅक्ट’च्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या काळात भारतातील ‘स्क्रीन टाईम’ आणि ‘व्हिज्युअल’ कमजोरी यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचे दिसून आले आहे. सुमारे २७५ दशलक्ष भारतीय किंवा आपल्या लोकसंख्येपैकी सुमारे २३ टक्के, जास्त ‘स्क्रीन’ वेळेमुळे दृष्टीदोषाने ग्रस्त आहेत. वास्तव आणि आभास यांच्यातील नेमका भेद जागतिक पटलावर लोकांना समजत असल्याने समाज माध्यमापासून दूर जाण्याचा कल एकंदरीत वाढत असल्याचेच चित्र जगाच्या पाठीवर आहे.
 
 
 
 

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121