राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल

पुणे नाशिक नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बदल्या

    13-Dec-2022
Total Views | 80

fadnavis
 
 
 
मुंबई : मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कमबॅकमुळे पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आलेल्या गृहविभागातील बड्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या असून यात पुणे नाशिक नवी मुंबईसह इतर काही शहरांच्या पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.
 
पोलीस अधिकारी सदानंद दाते यांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अप्पर पोलिस महासंचालकपदी तर विश्वास नांगरे पाटील आणि निकेत कौशिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालक मुंबई पदी नियुक्ती झाली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून मिलिंद भारंबे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे मावळते अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या जागी विनयकुमार चौबे पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्त पदी म्हणून आणण्यात आले आहे.
 
 
पुण्याचे अमिताभ गुप्ता यांची अप्पर पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्यपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रितेश कुमार पुण्याचे नवीन पोलिस आयुक्त असणार आहे. अतिरिक्त पुलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची अमरावती पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर पोलिस आयुक्तपदी ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
 
मधुकर पांडे यांच्याकडे मीराभाईंदर पोलिस आयुक्तपद, सत्यनारायण चौधरी यांच्याकडे मुंबई सहपोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी तर निशित मिश्रा यांची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121