अफगाणिस्तान परिस्थितीवर मोदी-पुतीन यांच्यात चर्चा

गुरुग्रंथसाहिब अफगाणिस्तानातून भारतात दाखल

    24-Aug-2021
Total Views |
 mod_1  H x W: 0 
 
 
गुरुग्रंथसाहिब अफगाणिस्तानातून भारतात दाखल

 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यादरम्यान दूरध्वनीवरून सुमारे ४५ मिनीटे चर्चा झाली. यावेळी अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि भारत–रशिया सहकार्य याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये झाली. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबिज केली आहे. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणस्तानमधील स्थितीविषयी अमेरिकेसह भारत आणि रशियाचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे.
त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीद्वारे ४५ मिनीटे चर्चा झाली. त्याविषयी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले, माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीविषयी चर्चा केली. त्याचप्रमाणे भारत – रशिया सहकार्य, द्विपक्षीय धोरण आणि करोनाविषयीदेखील चर्चा करण्यात आली. महत्वाच्या विषयांवर परस्परांशी सल्लामसलत करण्याविषयी दोन्ही राष्ट्रांमध्ये एकमत झाले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
गुरुग्रंथसाहिब अफगाणिस्तानातून भारतात दाखल
अफगाणिस्तानातून मंगळवारी ७८ जणांना भारतात आणण्यात आले. त्यामध्ये २५ भारतीय तर उर्वरित अफगाणी नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे भारतात आलेल्या तुकडीसोबत अफगाणिस्तानातील गुरुद्वारामधून शीखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरुग्रंथसाहिबच्या प्रतीदेखील भारतात आणण्यात आल्या आहेत. यावेळी दिल्ली विमानतळावर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुग्रंथसाहिबच्या प्रती आपल्या डोक्यावर ठेवून सन्मानाने बाहेर आणल्या.
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121