खडसे, सामंत आणि शरद पवारांमध्ये चर्चा

    03-Jun-2021
Total Views | 242

sharad pawar_1  
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवार, दि. 2 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या शरद पवारां सोबतच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
 
 
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. या दहा मिनिटांच्या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मंगळवार, दि. 1 जून रोजी जळगाव दौर्‍यावर होते. यावेळी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या निवासस्थानी त्यांनी खा. रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांची भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आज शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही घेतलेली सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ खडसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121