कुलगाम चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2020
Total Views |

Kulgam_1  H x W
 
नवी दिल्ली : कोरोनाच्या या काळामध्ये भारतीय लष्कर दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. जम्मूच्या नागनाड-चिमर भागात ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जम्मू-काश्मिर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी सकाळी काश्मिरमधील कुलगाम आणि जम्मूच्या चिमर भागात दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मोहीम आखून दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली. या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात जवानांना यश आले आहे.
 
 
यापूर्वी १३ जुलैला अनंतनाग जिल्ह्यात दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. परिसरात आणखी दहशतवादी असल्याचा संशय असल्याने जवानांकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये जून महिन्यात ४८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहीती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. सुरक्षा दलांनी या महिन्यात विविध दहशतवादी विरोधी कारवाया केल्या. त्यात ४८ दहशतवादी ठार झाले, ठार झालेल्यांमध्ये अनेक कमांडरचाही सामवेश आहे. २०२० मध्ये आत्तापर्यंत १२८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@