दिल्ली हिंसाचार : शांतता प्रस्थापित करण्यासोबतच हिंसाचाराविरोधातही कारवाई सुरु

    29-Feb-2020
Total Views | 54

delhi violence_1 &nb





नवी दिल्ली :
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर आता हळुहळू शांतता प्रस्थापित होत आहे. हिंसाचारामध्ये ४२ जणांचा मृत्यू तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल केले असून पाचशेहून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.


सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमध्ये दोन दिवस मोठा हिंसाचार झाला, प्रामुख्याने उत्तर – पूर्व दिल्ली भागामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. दिल्ली पोलिसांसह सुरक्षा दले आता शांतता प्रस्थापित करण्यासोबतच हिंसाचाराविरोधातही कारवाई करीत आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल केले आहेत, तर १०० जणांना अटक केली असून ५२३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.


हिंसा घडविणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आता सायबर सेलची मदत घेतली आहे. सायबर सेल १२ गुन्ह्यांचा तपास करीत असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. फुटेजची तपासणी करून हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सएप, ट्वीटर आणि फेसबुकद्वारे चिथावणीखोर मजकूर, छायाचित्रे आणि व्हीडीओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.


शांती प्रस्थापित करण्यास प्राधान्य : दिल्ली पोलिस आयुक्त


भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी एस. एन. श्रीवास्तव यांनी शनिवारी दिल्लीच्या दिल्लीच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार मावळते आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्याकडून स्विकारला. यावेळी दिल्लीत धार्मिक सौहार्द आणि शांतता प्रस्थापित करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी जास्तीत जास्त गुन्हे नोंदविण्यात येत असून हिंसाचारात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला अटक करण्याचा दिल्ली पोलिसांचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121