खुल्या विचारकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ! : चंद्रकांतदादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |
Chandrakant Patil _1 




मुंबई : महाआघाडीच्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बिघाडी झाली असून पुरोगामीत्वाच्या आणि खुल्या विचारांची कास धरणाऱ्या ढोंगी साहित्यिक व खुल्या विचारकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी! होत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.

 

९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात दैनिक 'मुंबई तरुण भारत'चे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. साहित्य संमेलनात दैनिक 'मुंबई तरुण भारत'च्या स्टॉलवर पोलीस उपनिरिक्षक माने यांनी पत्रकार सोमेश कोलगे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

 

विचार स्वातंत्र्याचे गुणगान गाणारे आता मात्र गप्प का? एका पत्रकारांवर साहित्य संमेलनात हा प्रसंग ओढावतो, ही कोणती दडपशाही आहे", असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात दैनिक'मुंबई तरुण भारत'चे वार्ताहर सोमेश कोलगे यांच्या अटकेचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

 

पोलीस उपनिरिक्षक माने यांनी 'मुंबई तरुण भारत'च्या स्टॉलवर येत सोमेश कोलगे यांना तेथून दूर नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबद्दल केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. या प्रकाराबद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

 

राज्यसभा खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनीही या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. "महाविकास आघाडी सरकारच्या राज्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही स्थिती आहे का?", असा परखड सवाल त्यांनी विचारला आहे. तर साहित्य संमेलनात दैनिक मुंबई तरुण भारतच्या प्रतिनिधींशी सोमेश कोलगे यांच्या अटकेचा प्रयत्न हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला नाही का, असा सवाल पत्रकार मृदूला राजवाडे यांनी विचारला आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@