निरव मोदीच्या अडचणीत वाढ ; १७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

    19-Sep-2019
Total Views | 46


नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायदंडाधिकारी न्यायालयात व्हिडियो कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते. नीरव मोदीच्या विरोधात भारतात मनी लॉड्रिंग आणि पीएनबी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल असून तो सध्या लंडनमध्ये आहे.

 

नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून त्याने भारतातून पलायन केले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वेस्ट लंडनमधील वाँड्सवर्थ तुरूंगात आहे. तेथील कायद्याप्रमाणे प्रत्येक आठवड्यानंतर ताब्यातील कालावधी वाढवण्यासाठी त्याला न्यायालयासमोर हजर केले जात आहे. या अगोदर मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी असे संकेत दिले होते की, दोन्ही पक्ष त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रस्तावित पाच दिवसांच्या सुनावणीवर लवकरच तयार होऊ शकतात.

अग्रलेख
जरुर वाचा
कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121