कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रतील भाविक प्रवाशाची सोय करण्याच्या हेतूने दरवर्षीप्रमाणे एसटीने यंदादेखील १३०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या यात्रेला विशेषतः कोकणातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या विभागातून भाविक प्रवाशांची जास्त गर्दी होते. यास्तव या ५ विभागातून मुंबई-११०, रायगड-१००, सिधुदुर्ग-३०, ठाणे-३०, रत्नागिरी-१२० विशेष जादा बसेस सोडण्यात येत आहेत. पंढरपूर येथे स्थानिक बसस्थानका बरोबरच चंद्रभागा नगर येथे विभागनिहाय तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक प्रवाशांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.