कर्नाटक निवडणुकांची आज होणार घोषणा ?

    27-Mar-2018
Total Views | 5


नवी दिल्ली : देशभरात सध्या चर्चा विषय बनत चाललेल्या आगामी कर्नाटक निवडणुकांचा तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून यामध्ये निवडणुकांसंबंधी एक महत्त्वाची घोषणा करण्यात येणार आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणुकांची तारीख जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सकाळी ११ वाजता आयोगाने आपल्या मुख्य कार्यालयामध्ये या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यासाठी सर्व पत्रकारांना आयोगाने निमंत्रण पाठवले आहे. तसेच निवडणुकीसंबंधी या परिषदेमध्ये महत्त्वाची घोषणा करण्यात येणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. दरम्यान येत्या एप्रिल-मे महिन्यामध्ये कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये कर्नाटक निवडणुकांसंबंधीच महत्त्वाची सूचना करण्यात येऊ शकते, अशी अटकळ अनेकांकडून बांधली जात आहे.


कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी आता काही काळच बाकी राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. संपूर्ण देशात कर्नाटक हे एकमेव मोठे राज्य सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. त्यामुळे याठिकाणी देखील आपली विजयाची गुढी उभारण्यासाठी सध्या भारतीय जनता पक्ष सर्व जोर लावत असल्याचे दिसत आहे. तसेच भाजपच्या दक्षिण दिग्विजयासाठी कर्नाटक विजय हा अत्यंत महत्त्वाचा असून कर्नाटक विजय हा भाजपचा दक्षिण भारतात प्रवेशासाठीची गुरुकिल्ली देखील ठरू शकते. त्यामुळे सध्या संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आजच्या पत्रकार परिषदेकडे लागले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121