लातूर, उस्मानाबादला भूकंपाचे सौम्य धक्के

    31-Oct-2017
Total Views | 5

 


 

लातूर : आज दुपारी महाराष्ट्रातील भूकंप प्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते. लातूरमधील औसा तालुक्यात तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातल्या सास्तूर माकणी परिसरात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यामुळे नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते. यावेळी प्रत्यक्षदर्शी प्रमोद पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे माहिती देताना सांगितले आहे की, “आज दुपारी १२.२३ वाजता औसा तालुक्यातील तुगी येथे भूकंपाचा आवाज आल्याने व जमीन हादरल्याने घरांमधून माणसे बाहेर आली.”

 

 

भारतीय हवामान खात्याने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या वृत्तास दुजोरा दिला आहे. या माहितीनुसार ३.०१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. औसा या लातुरमधील तालुक्याच्या सुमारे १० किलोमीटर परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवल्याचेही हवामान खात्याने कळविले आहे. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचे आमच्या वाचकांनी कळविले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसमधल्या

काँग्रेसमधल्या 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, महत्त्वाच्या पदावर पाणी सोडलं! सांगितलं 'हे' कारण...

(Anand Sharma Resigns As Chairman Of Congress Foreign Affairs Department) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी दि. १० ऑगस्ट रोजी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी, त्यासाठी आपण हे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा प्रदीर्घ काळापासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121