दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘कालजयी सावरकर विशेषांक’ प्रकाशित केला जातो. यंदा ‘स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांना लाभलेले सहकारी’ ही या विशेषांकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. बुधवार, दि. 28 मे रोजी सायंकाळी 6.45 वाजता डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर विद्यामंदिर येथे सदर विशेषांकाचे प्रकाशन आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Read More
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात बुधवार, २६ मार्च रोजी रघुनाथ धोंडो कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
ठाणे : “आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, निरामय जीवन जगता येते. मात्र, बदलत्या काळानुसार आरोग्यनीती बदलली आहे. काळाच्या ओघात अनेक घरगुती उपाय सांगणारा आजीबाईचा वटवा काळाच्या ओघात लोप पावत आहे. ही रुढी, परंपरा आपणच जपली पाहिजे,” असा मौलिक ( Rambhau Mhalgi ) सल्ला वैद्य सुविनय दामले यांनी दिला.
विविध वस्तूंचा संग्रह करणारी जगभरात अनेक माणसे असतात. मात्र, अशा अनोख्या संग्राहकांना एकत्र आणणार्या नाशिकच्या छंदोमयी प्रसाद देशपांडे यांच्याविषयी...
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (SNDT) सर विठ्ठलदास ठाकरसी विद्याविहार (जुहू आवार) येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी जगराणी विशेष व्याख्यानमालेचा कार्यक्रम पार पडला. ‘भारतीय महिला ऋषींचा बौद्धिक वारसा’ असा या व्याख्यानमालेचा विषय होता. यावेळी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक जयंत कुलकर्णी आणि अधिष्ठाता महेश भागवत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, भारतीय ज्ञान, संस्कृत एवं योग केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्र तिवारी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी आस
“तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्यामुळे ‘सायबर’ गुन्हे हे होतच राहतील. त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढेच सध्या आपण करू शकतो. आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात ‘सायबर सेफ’ संस्कृती जपावी लागेल,” असा सल्ला ‘सायबर’तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी दिला.
’अवरोध’ या वेबसीरिजमध्ये गोखले यांनी साकारली पंतप्रधान मोदी यांची भूमिका
संघमंत्राची अभिव्यक्ती’ या व्याख्यानमालेतील समारोपाचे आणि चौथे पुष्प अखिल भारतीय सहसंयोजक महिला समन्वयाच्या चंदाताई (भाग्यश्री) साठ्ये यांनी गुंफले. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोडीने राष्ट्र सेविका समितीचे काम सुरु आहे. संघस्थापनेपासून संघकार्यात महिलांचे योगदान दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही स्वरुपात चालू आहे. संघरुपी जनसागरात महिलांचे कार्य अनन्यसाधारण आहे. शिवशक्तीप्रमाणे संघकार्यात महिला आणि पुरुषांचे काम सुरु आहे. परस्परपूरक, परस्परावलंबी, परस्पर सहयोगी अशी धारणा ठेवूनच संघकाम आज अविरत चालू आहे.
“मातृत्वाची जबाबदारी आल्यानंतर दोलायमान स्थितीमुळे काही काळ आपणही ‘सी-सॉ’ अनुभवला. तेव्हा, निराश न होता चिकाटीने आपण आपले सर्वस्व कलेला अर्पण करण्याची प्रेरणा आईकडून मिळाली,” अशी जाहीर कबुली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आईची भूमिका साकारणार्या मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांनी दिली.
“काश्मीर म्हटले की, अशांतता, दहशतवाद आणि लष्करी कारवाया याबद्दल प्रतिक्रिया उमटतात. मात्र, सगळे काही सरकार करणार यापेक्षा आपणही काही जबाबदारी घेणे गरजेचे असून प्रतिक्रियेऐवजी ‘प्रतिसाद’ दिल्यास काश्मीर नक्कीच बदलेल,” असा ‘असिम’ विश्वास सारंग गोसावी यांनी व्यक्त केला आहे.
बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची वार्षिक सभा रविवार, 16 रोजी सायंकाळी 4 वाजता नवसाचा गणपती मंदिर हॉल, बजरंग बोगद्याजवळ होत आहे. तसेच या ठिकाणी योग बस्ती शिबीर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.