Shri Yogiraj Maharaj Gosavi Paithankar संतांचा सहवास कायमच अतुलनीय आनंद देणारा असतो. जसा संतांचा सहवास, तद्वतच त्यांचे सहित्य. श्री संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याचे कार्य ‘शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन’च्या माध्यमातून मागील दोन दशकांपासून सुरू आहे. अनेक संताचे कार्य, त्यांचे चरित्र यांचाही प्रसार करण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. अनेक उपक्रमांनी भागवतधर्माची ध्वजा उंचावण्याचे कार्य ही संस्था करते. संत साहित्याचे महत्त्व, संस्थेचे कार्य, हिंदू धर्मासमोरील समस्या अशा विविध प्रश्नांचा मि
Read More
साधकाच्या जडजीवनातील संस्कारांना धरून या लिंगदेहाला चांगल्या वा वाईट इच्छा राहू शकतात, म्हणून लिंगदेही अवस्थेत राहणारे पिशाच्चादी जीव, इतर जडशरीरांना झोंबून त्याद्वारे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतात. लिंगदेहाला जडशरीर नसल्यामुळे, त्याच्या इच्छातृप्तीकरिता त्याला इतर जडशरीरांवर कब्जा करून, इच्छापूर्ती करावी लागते. म्हणून पिशाच्चे इतरांना झोंबतात, त्यांच्या शरीराचा कब्जा घेतात आणि इच्छापूर्ती झाल्यावर ते शरीर सोडून निघून जातात. प्रबळ इच्छेने वा वासनेने प्रेरित झालेले लिंगदेही म्हणजेच पिशाच्च होत. मेल्यावर प्रत
अमेरिकेत होणाऱ्या बाराव्या 'वर्ल्ड कन्नाडा कॉन्फरन्स'ला जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सुप्रसिद्ध मुर्तीकार अरुण योगीराज यांचा व्हिसा अमेरिकन प्रशासनाने कुठलेही कारण न देता नाकारला आहे.
दया, क्षमा, शांती या गुणांनी योगिराजाला ओळखता येते. या योगिराजाला भौतिक जगातून काहीही मिळवायचे नसते. तो विश्वात असल्याने कशाचाही लोभ त्याला नसतो. अमुक गोष्ट मिळाली काय आणि न मिळाली काय, त्यावर त्यांचे सुख अथवा समाधी अवलंबून नसते. कोठेही चिकटून राहण्याचा त्याचा स्थायिभाव नसल्याने, काही मिळाले नाही तरी त्याचा त्याला राग येत नाही अथवा त्याचे मन चलबिचल होत नाही. असे असले तरी तो आपला स्वाभिमान विसरत नाही. तो रागलोभाच्या पलीकडे असला अथवा क्षमाशील, दयावान असला तरी तो कधीही दैन्यवाणा नसतो.
आर्यजन भोगवस्तूच्या पलीकडे जाऊन म्हणजे एका अर्थाने भोगघटनेला चिरीत जाऊन त्यापलीकडील सत्य जाणण्याचा सर्वदा प्रयत्न करतात. म्हणून ते आर्य. कधीच थांबत नाहीत आणि कधीच नष्ट होत नाही. सतत पुढे जाणारा, भोगातून अमर आनंद प्राप्त करणारा तो ‘आर्य असतो मा सद्मय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’ म्हणून जो सामर्थ्यवान असेल तोच भोग भोगू शकेल. शक्तिहीनांना काहीच प्राप्त होऊ शकत नाही.
रामललांची अयोध्येत दि.२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली. रामललाची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. त्यानंतर अयोध्येतच रामललाची मूर्ती बनवण्याची प्रेरणा मला मिळाल्याचे अरुण योगीराज यांनी सांगितले. संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणारे रामललाचे डोळे तयार करण्यासाठी त्यांना फक्त २० मिनिटे लागली. वास्तविक, त्यांनी एका खास क्षणी रामललाचे डोळे साकारले होते.
अयोध्येतील भव्य राम मंदिरात अरूण योगिराज यांनी साकारलेल्या रामललाच्या लोभसवाण्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. आकर्षक आणि मनमोहक अशी रामललाची मूर्ती घडविणार्या शिल्पकार अरूण योगिराज यांच्या कलकौशल्याचे जगभरातून कौतुक झाले. मात्र, अयोध्येत पार पडलेला रामललाच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद कर्नाटकातील काँग्रेस सरकारला झालेला दिसत नाही.
अयोध्येत विराजमान असलेली रामललाची मूर्ती देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. रामललाची मूर्ती तयार झाल्यानंतर पाहणारे ते पहिले व्यक्ती आहेत.अशा स्थितीत अभिषेक झाल्यानंतर अनेक माध्यमसमुहांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांना त्यांचा अनुभव विचारण्यात आला. या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी आपल्या मुलाखतीत आश्चर्यचकीत करणारे अनुभव सांगितले.
“मला वाटते की मी जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे. मला माझ्या पूर्वजांचे, माझ्या कुटुंबाचे आणि प्रभू रामललाचे आशीर्वाद नेहमीच लाभले आहेत. मला असे वाटते की मी स्वप्नांच्या जगात आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे.” अशी भावना रामललाची मूर्ती घडवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांनी व्यक्त केली आहे.
अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी संपूर्ण भारतात उत्साहाच वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थीतीत हा सोहळा पार पडणार आहे. २४ जानेवारीपासुन सर्व भारतीयांसाठी मंदिर खूले केले जाणार आहे.
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराममंदीरीत विराजमान होण्यासाठी मूर्ती निश्चित करण्यात आली आहे. ही मूर्ती आपल्या देशाचे प्रसिद्ध शिल्पकार योगिराज अरुण यांनी केली आहे. ते मुळचे कर्नाटकचे आहेत.
सूर्याच्या किरणांचे पृथक्करण केल्यास त्यातून दृश्यमान होणारे सप्तरंगच असतात. परंतु, या सप्तरंगापूर्वी आणि नंतरही अनेक रंग शलाका असतात. लाल रंगापूर्वीच्या रंग शलाकांना ‘इन्फ्रारेड’, तर जांभळ्या रंगानंतरच्या रंगशलाकांना ‘अल्ट्राव्हायोलेट’ असे म्हणतात. विद्युत उपकरणात या रंगशलाका दृग्गोचर होतात; पण मानवी नेत्र त्या रंगशलाका पाहू शकत नाही. दर सेकंदाला २० ते २० हजारांपर्यंत कंपन असणारे नादच माणसाला ऐकू येतात. त्या अगोदरचे किंवा त्यानंतरचे नाद माणसाच्या कर्णेंद्रियाला चेतवू शकत नाहीत.
म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज 'नेताजी सुभाषचंद्र बोस' यांचा ३० फूट उंच पुतळा तयार करणार आहेत. नेताजींचा हा पुतळा इंडिया गेट येथे अमर जवान ज्योतीच्या मागे भव्य छत्राखाली बसवला जाईल.