बालाकोट हवाई हल्ल्याला एक वर्ष उलटून गेले. भारतीय हवाई दलाने 'एअर स्ट्राईक' करत हुतात्मा जवानांचा बदला घेतला खरा परंतु, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी 'जैश-ए-मोहम्मद' ही संघटना आणि पाकिस्तानातील बहावलपूर मदरशात 'आश्रित' म्हणून डेरा घालून बसणारा मसूद अझहर याच्यावर कारवाई करण्याची तसदी पाकिस्तान सरकारने अद्याप घेतलेली नाही. फेब्रुवारीमध्ये मसूद बेपत्ता असल्याची माहिती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिली. मात्र, वारंवार खोटे बोलणार्या पाकचा बुरखा या ना त्या कारणाने टराटरा फाटणे, हे काही नवे नाही. खोट
Read More
या सर्वांच्याच हत्या झाल्या. राहुल गांधींनीच लावलेला तर्क जर या प्रत्येक ठिकाणी लावला तर त्या त्या घटनेनंतर फायदा कोणाला झाला? त्याचे उत्तर राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या कोणाही नेत्याने द्यावे.
अमेरिकेने शुक्रवारी 'कंट्री रिपोर्ट ऑफ टेरारिज्म २०१८' या अहवालात नमूद केले कि, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनावर कारवाई करून त्यांच्या भरती प्रक्रियेवर मर्यादा आणण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे.
फ्रान्सेस्का मॅरिनो यांच्या अहवालातील माहिती
इतर मित्र देशांचा वापर करून चीनविरोधात नवी आघाडी उघडली पाहिजे. गरजेच्या वेळी चीन जसा पाकिस्तानच्या मदतीला धावून येतो तसेच दक्षिण पूर्व आशियातील देश म्हणजे व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांचा वापर चीनविरोधात आघाडी तयार करण्यासाठी केला पाहिजे.
'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या मुसक्या आवळण्यासाठी आता फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रात मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने खोडा घातल्यानंतर आता फ्रान्सने मसूदला पहिला दणका दिला आहे. फ्रान्सने आता मसूदची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही द्वेषाची विचारधारा असून काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची विचारधारा असल्याची भूमिका काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात मांडली. याआधीही गेली अनेक वर्षं राहुल गांधी याप्रकारची भूमिका सातत्याने मांडत आहेत.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला एक महिना होत आला. तरी पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
मौलाना मसूद अजहरचा मृत्यू झाला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मौलाना मसूद अजहर हा भारताचा मोठा शत्रू आहे.
भारतने पुरावे दिल्यास कारवाई करू पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशींचे वक्तव्य
पुलवामामधील हल्ल्याचा बदला घेणार, हे भारताने ठणकावून सांगितल्यानंतर प्रत्युत्तराची भाषा करणार्या पाकिस्तानला भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकने धडकी भरली असल्यास नवल नाही. पाकिस्तानच्या रडार यंत्रणा, विमानलक्ष्यी प्रणाली यांना जराही सुगावा न लागता अवघ्या २० मिनिटांत भारताच्या १२ विमानांनी जवळपास १००० किलो बॉम्बंचा वर्षाव करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे काही तळ बेचिराख केले आहेत.
काँग्रेसकाळात देशाच्या एका मंत्र्याला पाकिस्तानच्या विरोधावरून आंतरराष्ट्रीय परिषदेतून परत यावे लागले, तर आज नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्याच परिषदेत भारताला ‘गेस्ट ऑफ ऑनर’ने सन्मानित करणार असल्याचेही सांगितले गेले. देशाला सर्वोच्चपदी घेऊन जाण्याच्या ध्येयाने झपाटलेली व्यक्ती नेमके काय करू शकते, काय घडवू शकते, त्याचा हा वस्तुपाठच!
भारताविरोधात पाकिस्तान, श्रीलंका वा बांगलादेशने आघाडी उघडली तर काय? असा प्रश्न एकदा एका मुलाखतकर्त्यांना के. सुंदर यांना विचारला, तेव्हा सुंदर यांनी दिलेले उत्तर आताही लागू पडेल असेच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे व सर्वपक्षीय नेत्यांसमोर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर थेट आक्रमण करण्याचा आपला निर्धार स्पष्ट करावा. अर्थात, राष्ट्रहित सर्वोपरी मानणाऱ्या नरेंद्र मोदींच्याच कार्यकाळात हे होऊ शकते आणि भाजपव्यतिरिक्त अन्य पक्षही मतभेद विसरुन केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.
जम्मू व काश्मीरमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश मानवी हक्कांचे उल्लंघन करत असल्याचा जावईशोध लावणार्या संयुक्त राष्ट्रांना उशिरा का होईना उपरती झाली आहे.