मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप'ला खिंडार

एकाचवेळी ७ आमदरांचा पक्षाला अखेरचा राम राम

    31-Jan-2025
Total Views | 124
 
 Delhi Assembly election
 
नवी दिल्ली  (Delhi Assembly election) : दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. कारण आपच्या सात नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत अखेरचा राम राम केला आहे. राजीनाम्यात त्रिलोकपुरीचे आमदार रोहित मेहरौलिया, कस्तुरबा नगरचे आमदार मदनलाल, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी आणि पालममधील भावना गौर यांचाही यामध्ये समावेश आहे.
 
बिजवासनचे आमदार भूपिंदर सिंग जून,आदर्श नगरचे आमदार पवन कुमार शर्मा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाने या आमदारांना दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ च्या निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नसल्याने नेत्यांमध्ये नाराजी नाट्य निर्माण झाले. यामुळे ते पक्षातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. राजीनामा दिलेल्या सूत्रांच्या सदस्यांनी शुक्रवारी ३१ डिसेंबर २०२५ रोजी माहिती दिली आहे.
 
 
 
मेहारोलीचे आमदार नरेश यादव यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. सलग दोन वेळा आमदार राहिलेल्या यादव यांनीही राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. काही आरोप हे खरे ठरल्यानंतर यादव यांनी आपल्या स्वेच्छेने त्यांचे तिकीट परत दिले आणि माघार घेतली आहे. त्यानंतर 'आप'ने महरेली मतदारसंघामध्ये दुसरा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

तस्करीतील परदेशी वन्यजीवांना परत पाठवण्याची जबाबदारी विमान कंपन्यांचीच - DGCA

विमानतळावर दाखल झालेल्या परदेशी वन्यजीवांना पुन्हा आलेल्या देशी धाडण्याची जबाबदारी ही विमान कंपन्यांचीच असल्याची स्पष्टोक्ती नागरी विमानवाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे (exotice live animal). यासंबंधीचे परिपत्रक त्यांनी २३ जुलै रोजी सर्व विमान कंपन्यांना पाठवले आहे (exotice live animal). गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी वन्यजीवांच्या तस्करीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. यासंबंधी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात आलेल्या परदेशी वन्यजीवांच्या तस्करीचे वार्तांकन सर्वप्रथम दै. मुंबई तरुण भारतने ..

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

विजय सत्याचा, विजय न्यायाचा, विजय हिंदुत्वाचा!

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्‍यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121