आऊटर रिंगरोड नागपूरसाठी 'लाईफलाईन' ठरणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

"फोर लेन आऊटर रिंग रोड/बायपास" प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते उद्धाटन

    05-Feb-2024
Total Views | 56

Devendra Fadanvis


नागपूर : सध्या नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. अशा स्थितीत आऊटर रिंगरोड हा नागपूरच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेसाठी 'लाइफलाइन' ठरणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. रविवारी नागपुरातील बहुप्रतिक्षित 'फोर लेन आऊटर रिंग रोड/बायपास' प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबतच पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, "जामठा आणि फेटरी दरम्यानचा हा ३३.५० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ८५६.७४ कोटी रुपये खर्चून बांधला आहे. लांब असलेल्या जागतिक दर्जाच्या रिंगरोड प्रकल्पात २ मोठे आणि २५ छोटे पूल, १ आरओबी, ३ उड्डाणपूल, सर्व्हिस रोड, बस बे/निवारा आणि सुरक्षिततेसाठी बांबू क्रॅश बॅरियर आहेत."


Fadanvis & Gadkari
 
"सध्या नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. अशा स्थितीत शहरातील वाढती वाहतूक सुरळीत करणे आणि नागपूरचा अन्य शहरांशी संपर्क साधणे अत्यंत गरजेचे आहे. या रिंगरोडमुळे नागपुरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या, रस्ते अपघात, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांमध्ये घट होणार असून वेळ व इंधनाची बचत होणार आहे. हा रिंगरोड नागपूरच्या वाढत्या वाहतूक व्यवस्थेसाठी 'लाइफलाइन' ठरणार आहे," असे ते म्हणाले.
 
पुढे ते म्हणाले की, "या रिंगरोडमुळे आर्थिक घडामोडींनाही चालना मिळणार आहे. या रिंगरोडमध्ये १ लाख कोटींची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. तसेच ८० कि.मी. लांबीच्या या रिंगरोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या आधुनिक विचारसरणीचे फलित म्हणजे हायटेक आणि आधुनिक पायाभूत सुविधा आणि मजबूत कनेक्टिव्हिटीमुळे नागपूर विकास आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. त्यामुळे नागपूरची गणना आता देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये होत आहे," असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, आमदार मोहन मते, डॉ. परिणय फुके, अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.




अग्रलेख
जरुर वाचा
शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

शाहू, फुले, आंबेडकर आणि अण्णा भाऊंसारखे महापुरुष असताना लेनिन-मार्क्स कशासाठी?

"भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि अण्णा भाऊ साठे यांसारखे थोर विचारवंत असताना, लेनिन आणि मार्क्ससारख्या परकीय विचारवंतांची गरजच काय?” असा थेट सवाल ज्येष्ठ शाहीर संदेश विठ्ठलराव उमप यांनी उपस्थित केला. अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाएमटीबी’ या युट्यूब वाहिनीवरील विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांच्यासोबत गायिका रागिणी मुंबईकर आणि ढोलकीवादक महेश लोखंडे हेही उपस्थित होते...

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी तील रस्त्यावरील छाटलेल्या झाडांच्या फांद्या उचलल्या ‘मुंबई तरूण भारत’ च्या वृत्ताचा इॅम्पकट

डोंबिवली एमआयडीसी परिसरात वीजवितरण कंपनीने विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या पण त्यानंतर छाटलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच टाकून दिल्या होत्या. महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसी या सर्वाचा निष्काळजीपणा आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. त्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी आवाज उठविला होता. या वृत्ताला ‘दैनिक मुंबई तरूण भारत’ ने दि. 1 ऑगस्ट रोजी प्रसिध्दी दिली. हे वृत्त प्रसिध्द होताच खडबडून जाग आलेल्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121