सुकन्या मोनेंचं सुकन्या नाही तर 'हे' आहे खरं नाव

    08-Sep-2023
Total Views |
 
sukanya mone
 
मुंबई : 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील सहा अभिनेत्रींपैकी दिलखुलास आणि हसरं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोने. अभिनयासोबत ज्यांना नृत्याची आवड आहे अशा सुकन्या यांनी आपल्या खऱ्या नावाबद्दल एक किस्सा नुकताच एका मुलाखतीत सांगितला.
 
तर अभिनेत्री सुकन्या मोने यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचं नाव वेगळंच ठेवण्यात आलं होतं. सुकन्या यांचा जन्म मुंबईत झाला. सुकन्या यांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब चाळीतून थेट ब्लॉकमध्ये राहायला गेले. लेकीचा जन्म होताच चाळीतून मोठ्या घरात गेल्यामुळे वडिलांनी त्यांचं नाव धनश्री असं ठेवलं. धनाची पेटी अशा आशयाने त्यांनी धनश्री हे नाव ठेवलं होतं. पण त्यांच्या आईला मात्र हे नाव आवडलं नाही. त्यामुळे आईने मुलीचं नाव सुकन्या असं ठेवलं. सुकन्या नावाप्रमाणेच त्यांनी मोठं व्हावं अशी आईची इच्छा होती. कालांतराने सुकन्या यांनी नावाला शोभेल असेच मराठी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केलं. सुकन्या मोनेंनी हा किस्सा 'दिल के करीब' या मुलाखतीत सांगितला होता.
 
सुकन्या मोने यांचा 'बाईपण भारी देवा' नंतर आगामी ‘इंद्रधनुष्य’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एबीसी क्रिएशन्स निर्मित या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. एक पुरुष आणि सात बायका असे चित्रपटाचे कथानक असणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

"राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. याॲपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121