बीकेसीतील वाहतूक कोंडी सुटणार ?

एमएमआरडीएकडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय

    17-Aug-2023
Total Views | 138

BKC


मुंबई :
मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या गंभीर बनला असून ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएकडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्याद्वारे पुढील पाच ते पंचवीस वर्षांतील वाहतूक आणि त्या अनुषंगाने करावयाच्या अत्यावश्यक उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येणार असून यासोबतच वांद्रे-कुर्ला संकुलात ‘इंटेलिजंट मॅनेजमेंट ट्राफिक सिस्टीम’ (आयटीएम) बसविण्याच्या दृष्टीने देखील अभ्यास करण्यात येणार आहे.
 
दररोज तेथे हजारो वाहनांची ये-जा बीकेसी परिसरातून होत असते. मात्र दिवसेंदिवस या वाहनांची संख्या अधिकाधिक वाढत असून त्यासोबतच रस्ते किंवा इतर वाहतुकीचे पर्याय विकसित होत नसल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा ही वाहतूक कोंडी दूर करता यावी यासाठी एमएमआरडीएकडून सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121