धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला सर्पदंश

    11-Jul-2023
Total Views | 363
One Person died due to snake bite

मुंबई : पावसाळ्यात धरणात व नदीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असतानाच आता धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला सर्पाने दंश केल्याने त्याचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे. चिपळूण येथे मित्रांसोबत आपल्या गावाकडे सहलीसाठी आलेल्या मुंबई-घाटकोपर येथील एका व्यक्तीला कळवंडे धरणात आंघोळ करताना पाण्यातच तीनवेळा सर्पदंश झाला व डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले. ही घटना रविवार दि. ९ जुलै रोजी सायंकाळी घडली. मुंबई घाटकोपर येथून पाच मित्र विकेंड असल्याने दोन दिवसापूर्वी पावसाळी सहलीसाठी संगमेश्वर परिसरातील आपल्या गावी आले. तेथे फिरून रविवारी ते चिपळूण येथे आले. दुपारी ३ वाजता खानपान करुन ते कळवंडे धरणावर आंघोळीला गेले.
 
दरम्यान, संजय तुकाराम कापरट (४६, रा. घाटकोपर, मुंबई) याला पोहताना सापाने पाण्यातच तीनवेळा दंश केला. सुरवातीला ते त्यांला समजले नाही, परंतु नंतर अंगात विष चढू लागल्याने तो अस्वस्थ झाला. त्याला प्रथम लाईफ केअर येथे आणण्यात आले, परंतु तेथे उपचारासाठी वेळ लागणार असल्याने त्याला कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्याला डेरवण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत शरीरात विष पूर्णपणे भिनले होते. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदन केल्यावर तीनवेळा सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचे पार्थिव मुंबई येथे नेण्यात आले.

अग्रलेख
जरुर वाचा
बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे...

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

...म्हणून शिल्पाच्या घरी यंदा बाप्पा येणार नाही, २२ वर्षांच्या परंपरेत पडणार खंड

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्षानुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करतात. सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या घरातील गणेशाची विशेष चर्चा होते. २२ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या घरी प्रथमच बाप्पा आणला होता. तेव्हापासून ती सातत्याने बाप्पाला घरी आणते. शिल्पाच्या घरी बाप्पा बसल्यावर ते फक्त सेलिब्रेशन नसतं, तर एक ग्लॅमरस फेस्टिव्हल असतो. तिच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे लाईमलाईट, सेलिब्रिटी पाहूणे, डान्स, गाणी आणि एक वेगळाच जल्लोष. चाहते तिच्या घरासमोर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी या प्रथेत खंड ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121