नांदेड शासकीय रुग्णालय प्रकरण: चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार: मुख्यमंत्री शिंदे

    03-Oct-2023
Total Views | 69
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : नांदेड जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २४ तासांत तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तर, चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, "मंत्रीमंडळ बैठकीत नांदेड रुग्णालयातील घटनेवर चर्चा झाली. प्राथमिक माहिती घेतली असता, रुग्णालयात १२७ प्रकारची औषधं उपलब्ध होती. औषधांची कमतरता नव्हती. याउलट १२ कोटींची मान्यता औषधांकरिता दिली. झालेल्या मृत्युंची चौकशी होईल. चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होईल. परंतु सरकारने ही बाब अतिशय गांभिर्याने घेतलेली आहे. मृतांमध्ये काही वयोवृद्ध लोक होते. त्यांना हृदयाचा त्रास होता. एक अपघात होता. त्यात काही नवं बालकं होती. ती प्री-टर्म होती. वजनाने कमी होती." चौकशी अंती जो अहवाल येईल, त्यावर आम्ही पुढील कारवाई करु. सरकार या घटनेवर लक्ष ठेवून असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121