हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली!

    27-Apr-2022
Total Views | 91
 
 
Ram Navami Riots 
 
 
 
नवी दिल्ली: श्रीराम नवमीच्या वेळी देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या धार्मिक हिंसाचाराची भारताच्या निवृत्त सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोगामार्फत चौकशी करण्याची विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. देशात श्रीराम नवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रांवर देशाच्या विविध भागांमध्ये दगडफेक आणि हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर अशांतता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी निवृत्त सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील आयोगामार्फत करण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका विशाल तिवारी यांनी दाखल केली होती.
 
सदर याचिकेवर न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. सुनावणीवेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. यावेळी न्यायालयाने म्हटले की, आयोगाचे अध्यक्ष माजी सरन्यायाधीश कसे असू शकतात, त्यासाठी कोणी मोकळे आहेत का, याची प्रथम माहिती घ्या आणि अशाप्रकारची विनंती न्यायालयाकडे हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली! करण्यात येऊ नये, अशीही टिप्पणी न्यायालयाने केली. दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयासमोर आणखी दोन याचिका यापूर्वीच प्रलंबित आहेत. दिल्लीतील जहाँगीरपुरी येथे झालेल्या जातीय हिंसाचाराची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्याची विनंती वकील विनीत जिंदाल यांनी केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. दुसरी याचिका दुसरे वकील अमृतपाल सिंग खालसा यांनी जहाँगीरपुरी दंगलीची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेण्यासाठी सरन्यायाधीशांसमोर पत्राद्वारे याचिका दाखल केली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन ..

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121