झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ ?

    13-Jul-2021
Total Views | 177

eknath khadase_1 &nb



मुंबई
: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची माहिती मिळते आहे. २०१७मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची समिती नेमली होती. या समितीचा अहवाल २०१७मध्येच सादर करण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना "भ्रष्टाचाराच्या फायली गायब झाल्या? चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या आल्यावर दुसरं काय होणार?" असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.



भातखळकर म्हणाले,मुळात हा अहवाल गहाळ झाला असेल तर तो अहवाल कसा गहाळ झाला याच उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य सचिवांनी द्यावं. खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर आणि त्याच्यावर ईडीची चौकशी लागल्यानंतर हा अहवाल गायब झाला ही बातमी येणं संतापजनक आहे. झोटिंग समिती ही न्यायिक समिती होती. झोटिंग समितीचा अहवाल जनतेसमोर खुला करा. जाणूनबुजून हा अहवाल गायब करण्यात आला आहे.याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी.तसेच आता विधानसभेत आवाज उठविण्याचे दिवस गेले. आता न्यायालयात जायचे की रस्त्यावर उतरायचे याचा निर्णय भाजप घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. आम्ही वेळ आल्यास न्यायालयात दाद मागू, असेही भातखळकर म्हणाले.

दरम्यान, अनेकदा हा अहवाल सभागृहात मांडण्याची मागणी करण्यात आली होती. पण हा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला नाही. झोटिंग समितीच्या अहवालात नेमकं काय आहे? हे शोधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य सचिवांना विचारणा केली होती. त्यावेळी हा अहवाल कुठेच सापडत नसल्याचे अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना कळवले आहे. आता हा अहवालाच सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडत नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीचा अहवाल गेला कुठे? असा सवाल उपस्थित होतोय. तसेच झोटिंग समितीचा गायब झालेला अहवाल आणि एकनाथ खडसे यांच्यामागे लागलेली ईडी चौकशी याचा काही संबंध आहे का? याबाबतही आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121