‘तान्हाजी’ नंतर अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज!

    13-Feb-2020
Total Views | 45
big bull_1  H x


अजयच्या चित्रपटात अभिषेक बच्चन दिसणार मुख्य भूमिकेत! 

मुंबई : ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’च्या अभूतपूर्व यशानंतर अजय देवगण आता एक कहाणी घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. अजयने नव्या पोस्टरद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.


अजयने ट्विटरवर त्याच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर ट्वीट केले असून, त्यासोबत प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. ‘बिग बुल’ असे या चित्रपटाचे नाव असून, २३ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘बिग बुल’ची कथा नव्वदच्या दशकातल्या सर्वात मोठ्या शेअर बाजाराच्या घोटाळ्यावर आधारित असून, या घोटाळ्यांचा मुख्य सूत्रधार हर्षद मेहतावर आधारित एक व्यक्तिरेखा अभिषेक बच्चन साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कूकी गुलाटी करणार असून, अभिषेक बच्चनसह इलियाना डिक्रूझ, निकिता दत्ता आणि सोहम शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बिग बुल’ हा अजय देवगणच्या होम प्रॉडक्शन चित्रपट आहे.

नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये सूट-बूट परिधान केलेला अभिषेक बच्चन दिसत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आर्थिक गुन्हेगारीवर आधारित खूप कमी चित्रपट आहेत. काही काळापूर्वी आलेला सैफ अली खानचा बाजारही शेअर बाजारात सुरू असलेल्या खेळावर आधारित होता. बिग बुलच्या माध्यमातून अभिषेक मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २०१९मध्ये आलेल्या मनमर्जीया या चित्रपटात अभिषेक झळकला होता. बिग बुल हा त्याचा यावर्षीचा पहिला चित्रपट असणार आहे. याशिवाय तो काल्पनिक पात्र बॉब बिस्बासवर आधारित सुजॉय घोषच्या ‘बॉब बिस्बास’ चित्रपटाच्या चित्रीकरणातही व्यस्त आहे. शाहरुख खान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121