'भूल भुलैय्या २' मधील कार्तिकचा पहिला लूक अक्षय कुमारशी जुळतो का

    19-Aug-2019
Total Views |


तब्बल १३ वर्षानंतर 'भूलभुलैय्या' हा चित्रपट एका नव्या अवतारात येत आहे. 'भूलभुलैय्या २' मध्ये कार्तिक आर्यन हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज त्याच्या चित्रपटातील भूमिकेचा पाहिला लूक चित्रपटकर्त्यांनी प्रदर्शित केला. हा लूक खूपच चमत्कारिक आहे पण त्याचवेळी या लूकमध्ये अक्षय कुमारच्या 'भूलभुलैय्या' चित्रपटामधील झलक दिसत आहे. या आधी अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये प्रेक्षकांचे मन जिंकण्याची जबाबदारी आता कार्तिक आर्यनवर आहे. पुढील वर्षी ३१ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर आहे. त्यामुळे आता ती छाप पुसून आपला नवीन ठसा उमटवणे कार्तिक आर्यनसाठी एक आव्हान असेल. मात्र, प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी चित्रपटकर्त्यांनादेखील विशेष प्रयत्न करावे लागतील,  हेदेखील तितकेच महत्वाचे आहे.

कार्तिक आर्यन सध्या त्याची तथाकथित गर्लफ्रेंड सारा अली खानबरोबर 'लव्ह आजकल २' आणि जान्हवी कपूर बरोबर 'दोस्ताना २' या दोन चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्यात 'भूलभुलैय्या' या चित्रपटाची आता भर पडली आहे. आज प्रदर्शित झालेल्या त्याच्या लूकमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121