जयकुमार रावलयांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय

    07-Jun-2019
Total Views |


 


संसदीय कामकाज मंत्रालयाची अतिरिक्त जबादारी विनोद तावडेंवर


मुंबई : गिरीश बापट यांची पुण्याच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांच्याकडील पालकमंत्री व मंत्रिपदाच्या जबाबदारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल केले. गिरीश बापट यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रालय, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय व पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबादारी होती. त्यामुळे त्यांच्याकडील असलेल्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी जयकुमार रावल यांना देण्यात आली असून संसदीय कामकाज मंत्रालयाची अतिरिक्त जबादारी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भाजपाध्यक्ष अमित शाहांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीला मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयीची चर्चा झाल्याची कुजबुज होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची दिल्लीत बढती झाल्याने महाराषट्राचा नवीन प्रदेशाध्यक्ष कोण या चर्चेला मात्र उधाण आले आहे.

 

पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदांमध्ये फेरबदल केले आहेत. या नवीन फेरबदलानुसार पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील यांची निवड झाली. तर जळगावच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची वर्णी लागली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज शासनाने परिपत्रक काढून पुण्याच्या पालकमंत्रीपदावर चंद्रकांतदादा पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121