शीखविरोधी दंगली घडवण्यात राजीव गांधी यांचा हात?

    10-May-2019
Total Views | 243



ज्येष्ठ वकील वकील हरविंदर सिंग फुल्का यांचा खळबळजनक खुलासा


नवी दिल्ली : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात उसळलेल्या शीखविरोधी दंगली विषयी ज्येष्ठ वकील वकील हरविंदर सिंग फुल्का यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या दंगलीनंतर शिखांची कत्तल करण्याचे आदेश थेट पंतप्रधान कार्यालयातूनच देण्यात आल्याचा दावा फुलका यांनी केला. याबाबत आपल्याकडे अनेक ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले.

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना फुल्का म्हणाले, १९८४ मध्ये भारतात शीखविरोधी वातावरण असताना शीख नागरिक दिसतील तिथेच त्यांना ठार मारण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आले होते. तसेच या काळात लष्कराला हस्तक्षेप करू न देण्याचे आदेशही देण्यात आल्याचा दावा फुलका यांनी केला. हरविंदर सिंग फुल्का हे मागील ३५ वर्षांपासून शीख विरोधी आरोपींच्या विरुद्ध लढा देत आहेत. शीख दंगलीवर आधारित When A Tree Shook Delhi या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे बोलले जात आहे.

 

राजीव गांधींचा हात

 

शीख विरोधी दंगली या केंद्र सरकारच्या पुढाकाराने झाल्या असल्याचा सीबीआयने अहवाल सादर केला होता. यात राजीव गांधी यांनी या दंगली भडकावण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना पत्रकारांनी विचारले असता, "जब एक बड़ा पेड़ गिरता है, तब पृथ्वी भी हिलती है" असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

 

१९८४ची शीख विरोधी दंगल का भडकली?

 

३१ ऑक्टोबर १९८४ साली इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या झाली. हा अंगरक्षक शीख होता म्हणून दिल्ली आणि देशाच्या काही भागात दुसऱ्याच दिवशी शिखांच्या विरोधात दंगली भडकल्या. इंदिरा गांधींच्या हत्येच्या प्रत्युत्तरात या सर्व दंगली झाल्या. या दंगलींमध्ये ३००० हून अधिक जणांचे मृत्यू झाले होते तर अनेक जण बेघर झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कामण -चिंचोटी परिसरात २ बोगस डॉक्टरांवर पालिकेची कारवाई , नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात अवैध वैद्यकीय व्यवसायिक प्रॅक्टीस करीत असल्याबाबत तोंडी माहिती प्राप्त झाल्याने अशा अवैध वैद्यकीय व्यवसायीकांपासून नागरीकांच्या जीवितास हानी पोहचण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने दि. २५ जुलै २०२५ रोजी चिंचोटी नाका, कामण परिसरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश चौहान, आर.सी.एच. अधिकारी डॉ. स्मिता वाघमारे, पीसीपीएनडीटी अधिकारी डॉ. पूजा गुप्ता, वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास दूधमल, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी नाईकनवरे आणि वैद्यकीय आरोग्य विभागा..

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

पोटच्या मुलींना विष देणाऱ्या क्रूर मातेचा पर्दाफाश; पाच दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातीलअस्नोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, पोटच्या तीन सख्ख्या मुलींना विष घालून हत्या करणाऱ्या आईला पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. काव्या (वय १०), दिव्या (वय ८) आणि गार्गी भेरे (वय ५) अशी मृत झालेल्या मुलींची नावे असून, संध्या संदीप भेरे (रा. चेरपोली) असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात तिन्ही मुलींच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आईला रविवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121