‘गेम ऑफ थ्रोन्स सीझन ८’ चा टीझर प्रदर्शित

    14-Jan-2019
Total Views | 25

 

 
 
 
  
मुंबई : ‘गेम ऑफ थ्रोन्स’ च्या सीझन ८ चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून‘गेम ऑफ थ्रोन्स’ चे चाहते या मालिकेच्या सीझन ८ ची वाट पाहत होते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आज जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सीझन ८ च्या टीझरसह या मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.
 

९० सेकंदाचा हा टीझर असून त्यात तीन महत्त्वाची पात्र दाखविण्यात आली. या टीझरवरून ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा शेवटचा सीझन कसा असेल याचा अंदाज बांधता येतो. ट्विटरवरून ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेच्या अधिकृत अकाऊंटवरून हा टीझर लाँच करण्यात आला. अवघ्या काही वेळातच या टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले.

 
 
 

‘गेम ऑफ थ्रोन्स’चा हा ८ वा सीझन फक्त ६ भागांचा असणार आहे. हा प्रत्येक भाग एका सिनेमाएवढ्या मोठ्या कालावधीचा असणार आहे. या सीझनमध्ये आयर्न थ्रोनवर कोण बसणार? Azor Ahai कोण आहे? Clegane bowl कोण जिंकणार? Cersei ला कोण मारणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्रेक्षकांना १४ एप्रिलची वाट पाहावी लागणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121