आपल्या जीवनात भूतकाळातील आठवणींचे अवशेष मनाला सुखावणारे असतात. परंतु, या सुखाच्या पलीकडे जाऊन खर्या अर्थाने आपण जेव्हा त्या त्या काळाचे अन्वयार्थ लावतो, तेव्हा समृद्ध असे विचारसंचित जन्माला येते. याच गोष्टीची प्रचिती म्हणजे नरेंद्र पाठक यांचा ललित लेखसंग्रह ‘वानोळा.’
Read More
( Dr. Ashutosh Javadekar ) शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ! असा संदेश भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. मात्र, आज समाज दुभंगला असुन संघर्षच (एजिटेट) करीत आहे. याला कारणीभूत आजची शिक्षणपद्धती आहे, तेव्हा ज्ञान देणाऱ्या शिक्षकापेक्षा 'जाण' देणारा गुरु हवा. असे मौलिक सल्ला सुप्रसिद्ध साहित्यिक, वक्ते, गायक दंतवैद्यक डॉ.आशुतोष जावडेकर यांनी दिला.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ' निवडक जयवंत दळवी ' या कार्यक्रमात दिवंगत लेखक, पत्रकार जयवंत दळवी यांच्या साहित्याचा स्मृतीजागर पार पडला. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात जयवंत दळवी यांच्या साहित्याच्याअभिवाचनचा कार्यक्रम संपन्न झाला. दिग्गज लेखक तथा नाट्यकर्मींच्या उपस्थिती मध्ये हा साहित्य सोहळा संपन्न झाला.
( Dharmendra Pradhan ) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी प्राकृत, पाली, मराठी, बंगाली आणि आसामी या पाच नवीन वर्गीकृत अभिजात भाषांच्या अभ्यासकांशी संवाद साधला. यावेळी भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चमू कृष्ण शास्त्री, युजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.
पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष आहे. या औचित्याने त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनाला सर्वोतोपरी पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही बुधवार, दि. २७ डिसेंबर रोजी दिली.
“शासनाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण माझ्या मनात शंका आहे की, अशा अनेक योजना आखल्या जातात. परंतु, त्यांची अंमलबजावणी किती होते, ही आर्थिक मदत कशा पद्धतीने केली जाणार आहे आणि या अशा अनुदानातून फक्त एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच ही अनुदानाची खिरापत वाटली जाऊ नये आणि नंतर साहित्य संमेलनाच्या नावाखाली आणखी गडबड होऊ नये एवढीच अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी दिली.
‘स्टुडंट पॉवर, नेशन पॉवर’ या सुत्रानुसार विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे डॉ. नरेंद्र पाठक. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणूनही त्यांचे कार्य ध्येयाप्रती समर्पित आहे. त्यांच्याविषयी...
“साहित्य संमेलनात साहित्याव्यतिरिक्त चर्चा होऊ नये, असा प्रयत्न सगळ्यांचाच असतो. महामंडळाचाही यंदा तोच प्रयत्न असेल. त्यासाठी निवडलेले विषय हे महत्त्वपूर्ण ठरतात. यावरून चर्चा कशी असावी, हे पाहिले जाते. काही परिसंवाद कथांवर, कादंबर्यांवर होणे, हेही महत्त्वाचे असते. राजकीय किंवा अन्य विषय शक्यतो संमेलनात असू नयेत, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे,” असे मत ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (अ.भा.म.सा.सं.) अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी साहित्य संघातर्फे (मुं.म.सा.सं) शनिवार, दि.