नव्या सत्रासाठी नावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला, सर्व्हर, वायफाय यंत्रणेची तोडफोड
Read More
विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणे शक्य व्हावे यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने आणि त्यास विद्यार्थी प्रचंड प्रतिसाद देत असल्याचे पाहून डाव्या संघटनांचे नेते बिथरले आणि त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्याचे षड्यंत्र रचले.
डाव्यांनी आतापर्यंत जसे भिन्न विचाराला व तशा विचाराच्या माणसांना मारून टाकले, त्यांच्या रक्ताचा सडा शिंपला तेच काम जेएनयुतही करण्याचे नियोजन त्यांनी केले. विचारांचा विरोध विचारांनी न करण्याची डाव्यांची ही तशी वर्षानुवर्षांपासूनचीच परंपरा व रविवारचा विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला त्याचाच नमुना! परंतु, पायाखालची वाळू सरकलेल्या व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी झालेल्या डाव्यांनी अशा हिंसाचारातून आपलेच थडगे बांधण्याचे काम केले आहे.