नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी एकविसाव्या शतकातील आव्हानांमध्ये भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्व सुनिश्चित करून संरक्षण सज्जतेमध्ये अभूतपूर्व प्रगतीचा पाया घातला जाईल. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने २०२५ हे वर्ष ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून घोषित केले आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath singh ) यांनी बुधवारी केले आहे.
Read More
नवी दिल्ली : भारतीय नौदल सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी रशियातील कॅलिनिनग्राड येथे ‘आयएनएस तुशील’ ( INS Tushil ) ही अत्याधुनिक बहुउद्देशीय मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या समारंभाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रशिया आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण अधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. ‘आयएनएस तुशील’ ही प्रोजेक्ट ११३५.६ची क्रिवाक खखख श्रेणीची अपग्रेड केलेली युद्धनौका आहे. ‘आयएनएस तुशील’ युद्धनौकेसाठी जेएससी रोसोबोरॉन एक्स्पोर्
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इंग्लंड दौर्यात पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेत, संरक्षण तसेच आर्थिक सहकार्य यावर उभय देशांनी एकत्र येत, काम करण्यावर भर दिला. इंग्लंडलाही भारताबरोबर नव्या जागतिक व्यवस्थेत भागीदार म्हणून काम करायचे आहे. उभय देशांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडणारा दौरा असे याला म्हणता येईल.
अभिनेते अनुपम खेर यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. अनुपम यांनी राजनाथ यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली असून यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केली अशी माहिती फोटो पोस्ट करत दिली.
भारताच्या दहशतवादविरोधी धोरणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आमूलाग्र बदल घडविल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
काश्मीरमध्ये दहशतवादाचा खात्मा होण्यास प्रारंभ झाला आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ६ व्या आसियानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी काल थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये दाखल झाले. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी संबंधित नेत्यांशी द्विपक्षीय संरक्षण संबंधांच्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला तसेच भारत आणि अन्य देशांमधील संबंध आणखी सुधारण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी काही माजी सैनिकांसोबत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा पाहिला.
राफेल डील प्रकरणी काँग्रेस जाणूनबुजून लोकांची दिशाभूल करत आहे. विनाशस्त्र विमानाच्या सामान्य किंमतीशी संपूर्ण शस्त्रसज्ज अशा लढाऊ विमानासोबत तुलना काँग्रेस करत आहे.” असे देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची हत्या करण्याविषयी व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोघांना उत्तराखंड पोलिसांनी अटक केली आहे.
भारत जरी कोणावरही स्वतःहून हल्ला करत नसला तरी विनाकारण आपल्यावर होणाऱ्या भ्याड हल्ल्यांचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे समर्थ आहे. हल्ला करणाऱ्या शत्रूविरोधात कारवाई करण्यासाठी सैनिकांना पूर्ण मोकळीक दिली गेलेली आहे. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, असे सीतारामन यांनी म्हटले.
भारतात नव्याने तयार करण्यात आलेल्या 'लाईफ एक्स्टेंशन टेक्नॉलॉजी'च्या पाहणी करण्यासाठी म्हणून ही चाचणी घेण्यात आली होती. तसेच ही पहिलीच चाचणी यशस्वी झाल्यामुळे सध्या देशभरातून डीआरडीओचे कौतुक करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी डोकलाम येथे भारत-चीन यांच्यात झालेल्या सीमावादानंतर डोकलाम येथील भारतीय लष्कर हे अधिक सावध झाले आहे.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः याविषयी माहिती दिली असून ब्राह्मोसच्या या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.